Team India semi-Final scenario: भारतीय संघ पहिलाच सामना हरला, उपांत्य फेरीचा मार्ग अवघड झाला; पाकिस्तानचा संघ पुढे गेला...

How Can India Qualify For Women's T20 World Cup Semi-Final: भारतीय महिला क्रिकेट संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मागील दहा सामन्यांत पराभवाच्या मालिकेसह वर्ल्ड कपमध्ये आलेल्या न्यूझीलंडने अखेर विजयाची चव चाखली.
IND vs NZ W
IND vs NZ Wesakal
Updated on

India Semi-final scenario Women's T20 World Cup 2024  : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप विजयाचा निर्धार करून मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडच्या संघाची ट्वेंटी-२० फॉरमॅटमधील मागील दहा सामन्यांतील कामगिरी पाहता टीम इंडिया बाजी मारेल असे वाटले होते. पण, न्यूझीलंडच्या महिलांनी त्यांची १० सामन्यांची पराभवाची मालिका खंडित केली आणि वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडच्या महिला संघाने ५८ धावांनी सामना जिंकून अ गटात अव्वल स्थानावर झेप घेतली. अ गटातील अन्य लढतीत आता भारताला गतविजेत्या ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान व आशिया चषक विजेत्या श्रीलंकेचा सामना करायचा आहे. या गटातून दोन संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत आणि पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला आहे.

काल सामन्यात काय झालं?

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंड संघाने २० षटकांत ४ बाद १६० धावा उभ्या केल्या. जॉर्जिया प्लिमर ( ३४) व सुझी बॅट्स ( २७) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. कर्णधार सोफी डिव्हाइनने ३६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची नाबाद खेळी केली. भारताच्या रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ १९ षटकांत १०२ धावांत तंबूत परतला. कर्णधार हरमनप्रीत कौर ( १५) हिने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. रोसमेरी मेयरने ४ आणि ली ताहुहूने ३ विकेट्स घेतल्या. एडन कार्सनने दोन बळी टिपले.

IND vs NZ W
Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

भारताला उपांत्य फेरीत जाण्यासाठी....

न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा रन रेट -२.९०० असा प्रचंड घसरला आहे. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तान ( रविवार) आणि श्रीलंका ( ९ ऑक्टोबर) यांच्याविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे आहे. तेही मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, ज्याने त्यांना चार गुणच मिळणार नाहीत, तर नेट रन रेटही सुधारेल. भारताचा साखळी गटातील शेवटचा सामना सहा वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी आहे. पण, हा सामना गमावल्यास भारताला न्यूझीलंडने उर्वरित दोन सामने गमवावे, अशी प्रार्थना करावी लागेल. तेव्हा नेट रन रेटवर सर्व गणित येऊन थांबेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.