CSK vs RCB: चेन्नई कुठे कमी पडली, ज्यामुळे व्हावं लागलं IPL 2024 मधून बाहेर? आव्हान संपल्यानंतर काय म्हणाला कर्णधार ऋतुराज

Ruturaj Gaikwad: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएल 2024 मधील आव्हान संपले. या पराभवानंतर चेन्नईचा नवा कर्णधार हंगामातील कामगिरीबद्दल व्यक्त झाला.
RCB vs CSK
RCB vs CSKSakal
Updated on

Ruturaj Gaikwad: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेच्या 68 व्या सामन्यात शनिवारी (18 मे) चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 27 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह चेन्नईचं आयपीएल 2024 मधील आव्हानही संपुष्टात आले.

या सामन्यात चेन्नईने 18 हून कमी धावांनी पराभव स्विकारला असता, तरी त्यांनी प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला असता. मात्र, प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी चेन्नईला अखेरच्या 2 चेंडूत 10 धावांची गरज होती. मात्र चेन्नईला एकच धाव घेता आली. त्यामुळे पराभवाबरोबरच चेन्नईचं या हंगामातील आव्हानही संपले.

दरम्यान, या हंगामाबद्दल आणि या सामन्याबद्दल चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड व्यक्त झाला. त्याने यंदाच्या हंगामातील चेन्नईच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी प्लेऑफमध्ये न पोहचल्याबद्दल निराशा झाली असल्याचेही म्हटले.

त्याने बेंगळुरूविरुद्ध नियमित अंतराने विकेट्स गमावल्याचा चेन्नईला फटका बसल्याचे मान्य केले.

RCB vs CSK
IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

चेन्नईच्या या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, 'खरं सांगू तर खेळपट्टी चांगली होती. त्यावर चेंडू फिरत होता, पण मला वाटतं 200 धावा व्हायलाच पाहिजे होत्या. आम्ही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.'

'एक किंवा दोन शॉट्स लागले असते, तर फरक दिसला असता. टी20 सामन्यात असं होतं. मी 14 सामन्यांतील 7 विजय मिळवून खूश आहे, फक्त जर शेवटच्या दोन चेंडूत आम्ही अंतर पार करू शकलो नाही.'

तसेच ऋतुराजने म्हटले संघातील मुख्य खेळाडूंच्या दुखापतीचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही पडला. तो म्हणाला, 'आमच्या संघात बऱ्याच दुखापती झाल्या. आमचे दोन प्रमुख गोलंदाज हंगामादरम्यान जखमी झाले. डेवॉन कॉनवेही यावेळी नव्हता. त्यामुळे महत्त्वाचे खेळाडू नसल्याने मोठा फरक पडतो.'

RCB vs CSK
IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

तो पुढे म्हणाला, 'मी चेन्नईच्या स्टाफला आणि सर्वांनाच श्रेय देईल की त्यांनी संपूर्ण हंगामात साथ दिली. पहिल्या सामन्यापासून अनेक आव्हानं आली. मुस्तफिजूर मध्ये गेला, पथिरानाला दुखापत झाल्या. अशावेळी संघात समतोल साधणं गरजेचं होतं.'

'आम्हाला शेवटच्या 2 चेंडूत 10 धावा हव्या होत्या, पण गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत. माझ्यासाठी वैयक्तिक यशापेक्षाही संघाचा विजय महत्त्वाचा आहे. जर विजय मिळाला नाही, तर निराशा असतेच. तुम्ही एका हंगामात 100 करा किंवा 500-600, संघाचं जिंकणं महत्त्वाचं असतं. पराभवाबद्दल मी नक्कीच निराश आहे.'

या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 7 बाद 191 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.