Yashasvi Jaiswal : मला आशा आहे की... पदार्पणातच रिव्हर्स स्विप मारणाऱ्या यशस्वीबद्दल काय म्हणाला अश्विन?

Yashasvi Jaiswal Ravichandran Ashwin
Yashasvi Jaiswal Ravichandran Ashwin esakal
Updated on

Yashasvi Jaiswal Ravichandran Ashwin : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीवर पहिल्याच दिवशी पकड निर्माण केली आहे. रविचंद्रन अश्विनने विंडीजचा निम्मा संघ गारद केला. यामुळे विंडीजचा पहिला डाव 150 धावात संपुष्टात आला. यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात नाबाद 80 धावा केल्या. कसोटी पदार्पण करणाऱ्या यशस्वी जैसवालने पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी नाबाद 40 धावा केल्या आहेत.

यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरूवात चौकाराने केली तर दिवसाचा खेळ संपत आला असताना त्याने रिव्हर्स स्विप मारण्याचे धाडस दाखवले. यशस्वीची ही बॅटिंग पाहून भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने जैसवालबद्दल काही महत्वाची वक्तव्य केली. (Yashasvi Jaiswal Test Debut News)

Yashasvi Jaiswal Ravichandran Ashwin
West Indies Vs India 1st Test : दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 162 धावांची आघाडी, यशस्वी दीडशतकाच्या जवळ

अश्विन पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला की, 'जैसवाल हा फार उत्साही क्रिकेटर आहे. तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे. मला आशा आहे की तो आपल्या कारकिर्दीत भव्य दिव्य गोष्टी करेल. मला असं वाटतं की त्याच्याकडून काही दमदार खेळीची अपेक्षा आपण करू शकतो.'

अश्विन खेळपट्टीबद्दल म्हणाला की, 'मला असं वाटतं की आम्ही चांगली कामगिरी केली. सुरूवातीला खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता. मात्र थोड्या वेळाने ती फिरकीला साथ देऊ लागली. मी टीव्हीवर देखील पाहिलं की चेंडू स्पिन होत होता. त्यामुळे आम्हाला खेळपट्टीशी जुळवून घ्यावं लागलं.'

'खेळपट्टी तशी कोरडी आहे. फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी पुरेसा असा वेग देखील खेळपट्टीत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला परिस्थितीशी कसं जुळवून घेता आलं पाहिजे.' (Ravichandran Ashwin News)

Yashasvi Jaiswal Ravichandran Ashwin
Prithvi Shaw Duleep Trophy : अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती पृथ्वी आला संघासाठी धावून, सर्वांकडून होतयं कौतुक

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या दोनसत्रातच विंडीजचा पहिला डाव 150 धावात गुंडाळला. अश्विनने 5 तर रविंद्र जडेजाने 3 विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडीजकडून अलिक अथानजेने सर्वाधिक 47 धावा केल्या. भारताने आपला दुसरा डाव तिसऱ्या सत्रात सुरू केला होता. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी 23 षटके फलंदाजी करत बिनबाद 80 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी यशस्वी जैसवला 40 तर रोहित शर्मा 30 धावा करून नाबाद होते.

(Sports Latest news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.