WI vs IND Team India : सहा तास विमानतळावरच! विंडीजमध्ये भारतीय संघाचे हाल, BCCI ने घेतला मोठा निर्णय

WI vs IND Team India
WI vs IND Team Indiaesakal
Updated on

WI vs IND Team India : भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरूद्धची कसोटी मालिका 1 - 0 अशी खिशात घातली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा पावसामुळे ड्रॉ झाला. या सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली होती. मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी पडलेल्या पावसासमोर भारतीय संघ हतबल झाला.

दरम्यान 27 जुलैपासून तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. यासाटी भारतीय संघ बार्बाडोस येथे पोहचली. मात्र या प्रवासादरम्यान भारतीय संघाचे चांगलेच हाल झाले. त्यांना त्रिनिदाद विमानतळावर जवळपास 6 तास विमानाची वाट पाहत बसावे लागले. (Team India Air Travel Issue)

WI vs IND Team India
World Cup 2023 : विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला कपिलदेव यांचा मोलाचा सल्ला, "दडपणाचे ओझे.. "

भारतीय संघाची बार्बाडोससाठी रात्री 11 वाजताची फ्लाईट होती. मात्र हे 11 वाजताच्या विमानाने रात्री 3 वाजता उड्डान घेतले. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय खेळाडू रात्री 8.40 ला विमानतळावर दाखल झाले.

मात्र रात्री 3 वाजचा विमानाने उड्डाण घेतले. यानंतर भारतीय संघ पहाटे 5 वाजता बार्बाडोस येथे दाखल झाला. यामुळे खेळाडू खूप नाराज झाले होते. यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे इथून पुढे विमान प्रवास सकाळी करण्याची विनंती केली. (West Indies Vs India ODI Series)

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, 'खेळाडू रात्री 8.40 ला हॉटेलमधून निघाले होते. त्यांना विमानतळावर खूपवेळ वाट पहावी लागली. संघ व्यवस्थापनाने आम्हाला रात्री उशिरा विमान प्रवास करण्याऐवजी सकाळच्या फ्लाईट बूक कराव्यात अशी विनंती केली आहे.'

'खेळाडूंना विमान प्रवासानंतर काही काळ आरामाची गरज असते. बीसीसीआय याबाबत सहमत झाला असून पुढच्या वेळेपासून प्रवासाचे शेड्युल सकाळच्या वेळी ठेवण्यात येईल.'

WI vs IND Team India
India Vs Pakistan World Cup : वेळापत्रकाचा गोंधळ काही थांबेना... भारत - पाकिस्तान सामना होणार रिशेड्युल?

कसोटी मालिका संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू काही काळ आराम मिळेल अशी अपेक्षा करत होते. कारण या संघातील बहूतेक खेळाडू हे वनडे संघात देखील आहेत. वनडे आणि कसोटी मालिकेत फक्त दोन दिवसांचा अवधी होता.

त्यात विमानतळावरील झालेल्या गोंधळामुळे संघाला म्हणावी तशी विश्रांती देखील मिळाली नाही.

वनडे संघातील सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे फक्त मर्यादित षटकांचे सामने खेळणारे खेळाडू यापूर्वीच बार्बाडोसमध्ये दाखल झाले आहेत.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.