Rohit Sharma : फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा सोडणार कर्णधारपद? माजी चीफ सिलेक्टर स्पष्टच बोला

रोहित शर्मा : फायनलमधील पराभवानंतर कर्णधारपदावर संशय? माजी चीफ सिलेक्टरची मत येते
Rohit Sharma World Cup 2023
Rohit Sharma World Cup 2023Esakal
Updated on

Rohit Sharma World Cup 2023 : एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट शतक झळकावले. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन संघ सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाने एकूण सहावे वर्ल्ड कप जिंकले आहेत. इंडिया टीव्हीशी बोलताना भारताचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी रोहितच्या कर्णधारपदावर मोठी गोष्ट सांगितली आहे.

Rohit Sharma World Cup 2023
Ind vs Aus : 'याला माज नाही तर काय म्हणायचं…' हातात बीअरची बाटली अन् वर्ल्डकप ट्रॉफी घेतली पायखाली

फायनलमधील पराभवानंतर रोहित शर्मा कर्णधारपद सोडू शकतो का? यावर प्रतिक्रिया देताना भारताचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा म्हणाला की, रोहित शर्माने या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केले आहे. त्यामुळे एक सामना त्याला महान किंवा वाईट खेळाडू बनवत नाही.

पुढे तो म्हणाला की, मी एका सामन्यातून कोणतेही मूल्यांकन करणार नाही. फायनलमध्ये कमी धावा झाल्या. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पण शेवटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

Rohit Sharma World Cup 2023
IND vs AUS Final 2023 : भारताच्या पराभवावर पाकिस्तानी अभिनेत्रीनं डिवचलं, 'आता भारतात...', नेटकऱ्यांनीही तिला सुनावलं!

असा आहे रोहितचा कर्णधारपदाचा विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेत एकूण 11 सामने खेळले, ज्यापैकी संघाने 10 जिंकले. एकदिवसीय वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक सामने जिंकणारा तो कर्णधार बनला आहे.

याआधी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेला हरवून आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत 45 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 35 जिंकले आहेत.

भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. सुरुवातीला भारतीय संघाने 10 षटकांत 80 धावा केल्या होत्या, मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांवर दडपण आले आणि त्यामुळे त्यांना मोठा डाव खेळता आला नाही.

भारताकडून रोहितने 47, विराट कोहलीने 54 आणि केएल राहुलने 66 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियासाठी मार्नस लॅबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चांगली भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.