भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी २० सीरीजचा शेवटचा सामना आज हरारे येथे खेळण्यात आला. या सामन्यात यशस्वी जैस्वालची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने पाच चेंडू खेळत अवघ्या १२ धावा नावावर केल्या. पण त्या करताना यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारताने या मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. यानंतर आजा या मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळण्यात आला. जैस्वालने या सामन्यात भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. त्याने सामन्याच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर, झिंम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने टाकलेल्या फुलटॉसवर सिक्स ठोकला. पण पंचांनी हा पहिलाच चेंडू नो बॉल दिला आणि त्यामुळे भारतीय संघाला 'फ्री हिट' मिळालला. त्यानंतर या 'फ्री हिट' चेंडूवर देखील जैस्वालने दुसरा सिक्सर लगावला. त्यामुळे त्याने एकाच लीगल चेंडूवर तब्बल १३ धावा मिळवल्या, ज्यापैकी १२ धावा जैस्वालच्या खात्यात गेल्या.
यासोबतच ओपनर म्हणून मेन्स टी २० क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर १२ धावा ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. जैस्वालने पहिल्याच षटकात भारताला दमदार सुरुवात करून दिली असली तरी त्याच षटकात फिरकीपटू रझाने झिम्बाब्वेचे पुनरागमन घडवून आणले. त्याने जैस्वालचा बदला घेत, रने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जैस्वालला क्लीन बोल्ड केले.
जैस्वालने चौथ्या T20 सामन्यात झिम्बाब्वेविरोधात 53 चेंडूत 93 धावांची शानदार खेळी केली होती. ५व्या T20I मध्ये जैस्वालला स्वस्तात बाद केल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताने झिम्बाब्वे समोर सहा गडी गमावून १६७ धावांचे लक्ष उभे केले. यामध्ये संजू सॅमसनने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या, तर शिवम दुबेने अवघ्या १२ चेंडूत २६ धावा ठोकल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.