Success Mantra: प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. अनेक लोकांच्या आयुष्यात कधी चांगल्या तर कधी वाईट गोष्टी घडत असतात. पण त्या सर्व गोष्टी इतरांना सांगणे गरजेचे नाही. सध्याच्या आधुनिक युगात अनेक लोक सोशल मिडियावर लगेच फोटो शेअर करतात. पण वडीलधारी माणसे नेहमी सांगायचे की, जेव्हा आयुष्यात काही चांगले घडणार असते, तेव्हा इतरांना जास्त सांगणे टाळावे. काम पुर्ण झाल्यावरच इतर लोकांना सांगावे. अन्यथा कामात अडचणी येऊ शकतात किंवा नकारात्मकता वाढू शकते.
तुम्ही नोकरी करत असाल तर त्या संबंधित गोष्टी कोणालाही सांगू नका. उदा. तुम्ही नोकरी बदलत असाल किंवा नोकरीत प्रमोशन मिळणार असेल तर अशा गोष्टी सांगू नका. फक्त जवळच्या लोकांना सांगावे. कारण जास्त लोकांना सांगितल्याने नकारात्मकता वाढते. तसेच कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कोणतेही काम पुर्ण होईपर्यंत सांगू नका.
आयुष्यात तुम्ही एक नवीन करार करत असाल, तुम्हाला व्यवसायात यश मिळणार असेल तर ही गोष्टी इतरांजवळ बोलू नका. कारण काम पूर्ण होण्यापूर्वी या गोष्टी सांगितल्या तर बहुतेक काम अपूर्ण राहते आणि त्यात नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते.
जर तुम्ही कष्टाच्या पैशाने एखादी मालमत्ता किंवा घर घेत असाल तर ही एक आनंदाची गोष्ट असते. पण काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे मालमत्तेची खरेदीसंबंधित कागदपत्रे पुर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका.
जर तुम्ही आयुष्यात पहिल्यांदाच नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर जास्त लोकांना सांगू नका. जेव्हा तुमचा व्यवसाय सुरू होईल तेव्हाच लोकांना सांगा. अन्यथा अडचणी किंवा नकारात्मकता वाढू शकते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.