'धैर्यशील मानेंचा पराभव दिसू लागल्यानेच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली'; 'स्वाभिमानी'च्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू आहेत.
Hatkanangale Lok Sabha
Hatkanangale Lok Sabhaesakal
Updated on
Summary

वरपर्यंत पराभवाचा सुगावा पोचल्याने खर्च केलेल्या पैशाची चौकशी होण्याच्या भीतीतून निशिकांत पाटील यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

इस्लामपूर (सांगली) : महायुतीचे हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचा पराभव दिसू लागल्यानेच इस्लामपूर मतदारसंघातील (Islampur Constituency) स्थानिक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

Hatkanangale Lok Sabha
Kagal Tehsil : कागल तहसीलमधील अव्वल कारकून 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; कारवाईमुळे तहसील कार्यालयात उडाली खळबळ

राजू शेट्टी हेच यावेळच्या विजयाचे दावेदार असल्याचे ते म्हणाले. संघटनेचे प्रवक्ते अॅड. शमसूद्दीन संदे, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, शिवाजी पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. संदे म्हणाले, "महायुतीने साम, दाम, दंड, भेद आयुधांचा वापर करूनही उमेदवार विजयी होत नाही, याची त्यांना खात्री पटली आहे. अपयशाचे खापर कोणावर फोडायचे म्हणून निशिकांत पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केल्याचा कांगावा सुरू आहे.

सर्वसामान्यांच्या जीवावर शेट्टी यांनी निवडणूक लढवली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील एकाही प्रस्थापित नेत्याची सहानुभूती त्यांना मिळाली नाही." भागवत जाधव म्हणाले, "सामान्य मतदारांच्या, शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी लढले. निवडणूक लढवण्यासाठी ५० रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची मदत सामान्य लोक, ऊस उत्पादकांनी केली. प्रहार संघटना व इतरांनी प्रचार यंत्रणा राबवली. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रचार केल्याचा आरोप धादांत खोटा आहे. पराभवाच्या शंकेने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Hatkanangale Lok Sabha
'या' अभिनेत्रीसह 101 सेलिब्रिटींचा रेव्ह पार्टीत सहभाग; कारवाई करत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी ८२०० कोटी रुपयांचा निधी दिल्याचा कांगावा केला; मात्र तरीही अखेरच्या टप्प्यात माने तिसऱ्या क्रमांकावर जाणार याची विरोधकांना जाणीव झाल्यानेच हे आरोप सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपये या मतदारसंघात आणले, मात्र ते मतदारांपर्यंत पोहोचले नसल्याची लोकांमध्ये चर्चा आहे. हे पैसे कसे पचवायचे म्हणून त्यांच्यात आपापसात भांडणे लागली आहेत. प्रचाराचा बेबनाव करून स्वाभिमानी संघटनेत वाटणीचा प्रयत्न करत आहेत."

Hatkanangale Lok Sabha
कोल्हापूर, सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील दरोडेखोरांची टोळी कऱ्हाडात पकडली; तीन पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

पोपट मोरे म्हणाले, "मागील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शेट्टी यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला. विद्यमान खासदार फिरकले नाहीत. सरूडकरांचा निर्णय अंतिम टप्प्यातला होता. त्यांचा विषयच नाही. मतदारसंघात मुख्यमंत्री तळ ठोकून होते, याचे सामान्यांना कोडे आहे. त्याला आर्थिक संशयाची झालर आहे." शिवाजी पाटील म्हणाले, "सर्वसामान्यांनी ही निवडणूक लढवली. वरपर्यंत पराभवाचा सुगावा पोचल्याने खर्च केलेल्या पैशाची चौकशी होण्याच्या भीतीतून निशिकांत पाटील यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे." बाबासाहेब सांद्रे, नितीन चौगुले, प्रकाश माळी, मानसिंग पाटील, उत्तम पाटील, प्रकाश साळुंखे, रमेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.