Loksabha Election Voting : मराठवाड्यात टक्का वाढला ;बीड, औरंगाबाद, जालन्यात गतवेळीपेक्षा अधिक मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांसह दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांत आज संध्याकाळी सहापर्यंत ६४.४३ टक्के मतदान झाले.
Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांसह दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांत आज संध्याकाळी सहापर्यंत ६४.४३ टक्के मतदान झाले. राज्यात ढगाळ वातावरण असल्याने दुपारीही मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या. इतर राज्यांच्या महाराष्ट्रात तुलनेने कमी मतदान झाले. पण, मराठवाड्यातील आैरंगाबाद, जालना आणि बीड मतदार संघात मागील निवडणूक पेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली. संध्याकाळी पाचपर्यंतची मतदानाची टक्केवारी निराशाजनक असली तरी, त्यानंतर मतदारांनी मोठ्याप्रमाणावर मतदान केल्याने अनेक मतदारसंघांत मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान झाले.

राज्यातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी, बीड, नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना आणि औरंगाबाद या ११ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान नंदुरबार, जालना आणि बीड जिल्ह्यांत झाले. संध्याकाळनंतर मतदारांनी गर्दी केल्याने मतदानाची वेळ उलटून गेल्यावरही या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या.

त्यामुळे मागील तीन टप्प्यांप्रमाणे यावेळीही मतदानाच्या अंतिम टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात प्रशासनाने मतदान केंद्रांवर आकर्षक सेल्फी पॉइंट तयार केल्याने मतदारांचा उत्साह वाढला होता. राज्यात किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. जालन्यात काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्र बिघडण्याचे प्रकार घडले, मात्र अधिकाऱ्यांनी तातडीने यंत्रे बदलल्याने मतदानात अडथळा आला नाही.

देशातील ९६ मतदारसंघातील १,७१७ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे. आंध्र प्रदेशातील २५, तेलंगणमधील १७, उत्तर प्रदेशातील १३, प. बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी आठ, बिहारमधील पाच, ओडिशा आणि झारखंडमधील प्रत्येकी चार तर जम्मू काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान झाले. या टप्प्यातील मतदानानंतर ३७९ लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडले आहे. आंध्रमध्ये १७५ विधानसभेच्या जागांसाठीही आज मतदान पार पडले आहे.

अखेरच्या टप्प्यासाठी आज अखेरची मुदत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम, म्हणजे सातव्या टप्प्यातले मतदान एक मे रोजी होणार असून यासाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची उद्या (मंगळवार) अखेरची मुदत आहे. दाखल अर्जांची छाननी १५ मे रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १७ मे आहे. अखेरच्या टप्प्यात आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मतदान होणार आहे. यातील पंजाब आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी १३ जागांवर मतदान होईल. तर प. बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशातील सहा, हिमाचल प्रदेशातील चार, झारखंडमधील तीन जागांवर मतदान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.

काही ठिकाणी हिंसक घटना

  • आंध्र प्रदेश : अनेक ठिकाणी हिंसक घटना

  • आंध्र प्रदेश : गुंटूरचे आमदार व्ही. शिवकुमार यांची एका मतदारासोबत हाणामारी

  • उत्तर प्रदेश : काही गावांतील लोकांचा मतदानावर बहिष्कार

  • प. बंगाल आणि ओडिशा : ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी

  • प. बंगाल : गैरप्रकार झाल्याच्या भाजप आणि तृणमूलकडून तक्रारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com