Akshay Shinde Encounter: नेमका मृत्यू कशामुळे? पोस्टमार्टम रिपोर्टमधून अक्षयच्या मृत्यूचं कारण आलं समोर

Mumbai Crime: पाच डॉक्टरांच्या टीमने अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे. अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.
Akshay Shinde Encounter: नेमका मृत्यू कशामुळे? पोस्टमार्टम रिपोर्टमधून अक्षयच्या मृत्यूचं कारण आलं समोर
Updated on

Badlapur School Crime: बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्या गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या, असं सांगितलं जातंय.

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे. तब्बल सात तास चाललेल्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आलेला आहे. अक्षयचा मृत्यू हा अतिरक्तस्रावाने झाला असल्याचा उलगडा झालाय.

पाच डॉक्टरांच्या टीमने अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे. अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्याला गोळी लागल्याने अतिरक्तस्राव झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या एन्काऊंटर प्रकरणाचीही सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे.

दुसरीकडे अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचे नातेवाईक रुग्णालयात आलेले नव्हते. सोमवारी त्याच्या आई-वडिलांनी इतर आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे ते आता काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Akshay Shinde Encounter: नेमका मृत्यू कशामुळे? पोस्टमार्टम रिपोर्टमधून अक्षयच्या मृत्यूचं कारण आलं समोर
Israel Lebanon War: इस्राईल हल्ल्याच्या भीतीने दक्षिण लेबनॉनमधील हजारो नागरिक विस्थापित, महामार्गांवर रांगा

दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मंगळवारी ते माध्यमांशी बोलत होते. पटोले म्हणाले की, हे सरकार उडवाउडवीची उत्तर देत आहे. ज्या पद्धतीचं एन्काऊंटर झालेला आहे तो भाजपशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी केला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पटोले पुढे म्हणाले की, हे सरकार दमदाटी करणारं सरकार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. कॅबिनेटमध्ये निर्णय होताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना बळजबरीने योजना राबवायला सांगितल्या जात, आहे अशी आमची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.