अशोक चव्हाण यांनी मांडलं मतांच्या टक्केवारीवरून मोदी सरकारच्या पराभवाचं गणित; म्हणाले...

Narendra modi and India allince
Narendra modi and India allince
Updated on

मुंबई - विरोधीपक्षांनी तयार केलेल्या इंडिया आघाडीची बहुचर्चित बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दोन दिवशी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला पराभूत कसं करता येईल, याविषयी विधान केलं.

Narendra modi and India allince
फडणवीस-मोदीजी नवनीत राणा यांना आशीर्वाद देतील; रवी राणा यांनी व्यक्त केला विश्वास

अशोक चव्हाण म्हणाले की, २०१९ निवडणूक मध्ये आघाडीत आज जे पक्ष आहेत, त्यांना एकूण २३ कोटी ४० लाख मत मिळाले होते. तर भाजपला २२ कोटी मत मिळाली होती. तरी भाजपचा विजय झाला. तेव्हा विरोधक सगळे वेगळे होते. शिवाय भाजपने जिथे सरकारे पाडली ते सोडून ११ मुख्यमंत्री या आघाडीत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष तोडला तरी आमचे सरकार आले.

Narendra modi and India allince
Koregaon Bhima Update: कोरेगाव भीमा दंगलीत प्रशासनाची भूमिका संशयास्पद! आंबेडकरांनी केली 'ही' मागणी

अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आमचा केवळ विरोध करायचा अजेंडा नाही. विकासाचे काम करण्यासाठी आणि लोकशाहीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. 'इंडिया' च्या माहोलनंतर महाराष्ट्रात पण आमच्या मित्र पक्षांचे सरकार येईल असा विश्वासही चव्हाण यांनी मांडला.

चव्हाण म्हणाले की, आधी इंडिया आघाडीत २६ पक्ष होते. मात्र आता या आघाडीत २८ पक्ष एकत्र आले असून उद्या आघाडीत २८ पक्ष आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.