उभे राहून पाणी पिणे टाळा, अन्यथा..! पचनसंस्था, किडनी, सांधेदुखी, फुफ्फुसावर होईल परिणाम; जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नका

लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते. पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास अनेक फायदे होतात. पण, जर चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोचते, तरी लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात.
solapur
Drinking Watersakal
Updated on

सोलापूर : लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते. पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. पण, जर चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोचते, तरी देखील लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, उभे राहून पाणी पिल्याचे परिणाम संबंधित व्यक्तीस काही दिवसानंतर दिसू लागतात. त्यामुळे उभे राहून नव्हे तर शांतपणे बसून पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. तावातावाने कितीही पाणी पिणे टाळावे, असेही आवाहन केले जाते.

उभे राहून पाणी पिणे टाळा, अन्यथा...

  • १) तहान भागत नाही

  • उभे राहून कधीही पाणी पिऊ नये, असे केल्याने तुमची तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा ते बसूनच प्यावे. जेणेकरून तहान भागेल व त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही.

  • ---------------------------------------------------------------------------

  • २) पचनसंस्थेला पोहोचते हानी

  • पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. पण, चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते. खरे तर, जेव्हा उभे राहून पाणी पितात, तेव्हा ते वेगाने खाली जाते. येथे ते पोटाच्या खालच्या भागात पोहोचू शकते आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते.

  • ------------------------------------------------------------------

  • ३) किडनीवरही होऊ शकतो परिणाम

  • उभे राहून पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या सवयीमुळे कालांतराने किडनी देखील खराब होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे, तेव्हा हळूच बसून प्यावे. जेणेकरून त्यामुळे किडनीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

  • -------------------------------------------------------------------------

  • ४) शरीरातील द्रव संतुलन बिघडून होईल सांधेदुखी

  • सतत उभे राहून पाणी पिल्याने तुमच्या सांध्यांना हानी पोचवू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. वास्तविक, उभे राहून पाणी प्यायल्याने मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सांधेदुखी सुरू होते.

  • -----------------------------------------------------------------------

  • ५) फुफ्फुसापासून हृदयार्यंत होईल वाईट परिणाम

  • उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावरही परिणाम होतो. त्यामुळे जर फुफ्फुसाशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर उभे राहून चुकूनही पाणी पिऊ नका. उभे राहून पाणी प्यायल्याने ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो, ज्याचा फुफ्फुसापासून हृदयार्यंत खूप वाईट परिणाम होवू शकतो.

जेवणानंतर लगेचच पाणी प्यायला नको

उभे राहून घाईगडबडीत पाणी पिल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम होवू शकतो. दुसरीकडे जेवणापूर्वी किंवा जेवण करताना मधूनमधून घोट घोट पाणी पिल्यास पचन सुधारते. जेवणानंतर लगेचच पाणी पिणे टाळावे, त्यामुळे अग्नीचे काम कमी होते.

- डॉ. विना जावळे, प्राचार्य, शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.