मोठा निर्णय! इयत्ता बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारची भन्नाट योजना; ‘येथे’ करा नोंदणी अन्‌ दरमहा मिळवा 6,000 ते 10,000 रूपये

बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
solapur
mantralaysakal
Updated on

सोलापूर : शिक्षण पूर्ण करून रोजगार, नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरूण-तरूणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही. त्यातूनच बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

किमान २० रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील १० लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाणार आहे. पण, एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास, त्यांना विद्यावेतन मिळणार नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरूणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे.

योजनेचे स्वरूप

  • विनाअनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना मिळणार आस्थापना उद्योगात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण

  • उमेदवाराचा प्रशिक्षण कालवधी राहणार सहा महिन्यांचा

  • मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाकडून मिळणार विद्यावेतन

  • ऑनलाइन उपस्थितीच्या आधारावर मिळेल उमेदवारांना विद्यावेतन, ते दरमहा थेट लाभार्थींचा खात्यात जमा होईल

  • प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल

  • शासनाच्या योजना गावपातळीवर पोचविण्यासाठी ५० हजार योजना दूत नेमले जाणार

शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन

  • १) इयत्ता बारावी उत्तीर्ण : प्रतिमहा सहा हजार रूपये

  • २) आयटीआय, पदविका : दरमहा आठ हजार रूपये

  • ३) पदवीधर-पदव्युत्तर : दरमहा दहा हजार रूपये

योजनेत सहभागी होण्याची पात्रता

  • उमेदवाराचे वय किमान १८ ते ३५ पर्यंत असावे

  • शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर पदवी पूर्ण असावी

  • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याची आधार नोंदणी असावी

  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी

काही दिवसांत सुरू होईल योजनेची अंमलबजावणी

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता सुरू करण्यात आली आहे. त्याची कार्यपद्धती काही दिवसांत निश्चित झाल्यानंतर योजनेची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

- हनुमंत नलावडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.