मोठी बातमी! विद्यापीठ परीक्षेचा कालावधी आता ३० दिवसच राहणार; दिवस कमी करण्यासाठी समिती; सत्र परीक्षा मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा आता ४५ दिवसांऐवजी अवघ्या ३० दिवसांतच उरकली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सत्र परीक्षेचा कालवधी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत झाला आहे.
exam
examsakal
Updated on

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा आता ४५ दिवसांऐवजी अवघ्या ३० दिवसांतच उरकली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सत्र परीक्षेचा कालवधी कमी करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या बैठकीत झाला आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समिती नेमली आहे.

राज्यात एकाच जिल्ह्यापुरते विद्यापीठ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाशी संलग्नित एकूण १०९ महाविद्यालये असून त्याअंतर्गत जवळपास ८० हजार विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात. पण, विद्यापीठ स्थापन झाल्यापासून नेहमीच विद्यापीठ परीक्षा व निकालाच्या गोंधळामुळे चर्चेत राहिले आहे. पुणे, मुंबईसह अन्य विद्यापीठाच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी असतानाही परीक्षेचा कालावधी तब्बल ४५ दिवस होता. आता तो ३३ दिवसांवर आणण्यात आला आहे, पण ३० दिवसांतच परीक्षा व्हायला हवी म्हणजे निकालास विलंब लागणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही पुढील शिक्षणासाठी अडचणी येणार नाहीत हा त्यामागील हेतू आहे. त्यादृष्टीने समितीचा अभ्यास सुरू असून पुढच्या आठवड्यात कुलगुरूंना समिती अहवाल सादर करेल. त्यानुसार आगामी सत्र परीक्षा ३० दिवसांत संपविण्याचा प्रयत्न विद्यापीठाचा आहे.

विद्यापीठाच्या या पुढील प्रत्येक परीक्षेसाठी हा पॅटर्न असणार आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत होऊन काही दिवसांत निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करता येईल. विद्यार्थ्यांनाही पुढच्या प्रवेशासाठी विलंब होणार नाही आणि प्राध्यापकांनाही वेळेवर सुट्टी मिळेल, हा हेतू आहे. दरम्यान, परीक्षेचा कालावधी कमी करताना विद्यार्थ्यांना दोन पेपरमध्ये अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. त्यानुसार आगामी सत्र परीक्षेचे वेळापत्रक तयार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘पीएच.डी’ उमेदवारांना त्याच दिवशी मिळेल खुशबखर

पीएच.डी करणाऱ्या उमेदवारांचा ‘व्हायवा’ झाल्यानंतर चार- पाच दिवसांनी विद्यापीठाकडून त्या उमेदवाराला डॉक्टरेट मिळाली की नाही हे सांगितले जाते. पण, आता यापुढे ज्या दिवशी व्हायवा होईल, त्याच दिवशी काही तासांत त्या विद्यार्थ्याला डॉक्टरेट मिळाल्याची खुशखबर दिली जाणार आहे. अभ्यास मंडळाच्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तसा निर्णय घेतला आहे.

परीक्षेचे दिवस कमी करण्यासाठी पर्याय...

  • १) ऑड (प्रथम, तृतीय, पाचवे, सातवे सेमिस्टर) आणि इव्हन (द्वितीय, चतुर्थ, सहावे, आठवे सेमिस्टर) सेमिस्टरच्या परीक्षा एकाचवेळी घेता येतील

  • २) बीए, बीकॉम, बीएससी आणि एमए, एमकॉम, एमएससीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र दिवशी परीक्षा न घेता या अभ्यासक्रमांची परीक्षा एकाच दिवशी घेण्याचे नियोजन

  • ३) प्रत्येक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कठीण पेपरसाठी अभ्यास करायला वेळ देण्याचाही प्रयत्न; प्रत्येक महाविद्यालयातील सुविधांचा वापर परीक्षेसाठी एकाचवेळी करता येईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.