बारामती लोकसभा प्रचारात भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'त्यांनी केलेल्या विधानात काही अर्थ नव्हता. काही तथ्य नव्हतं.आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो तुम्ही काय काम असेल ते पुण्यात पाहा, बारामतीत आमचे कार्यकर्ते पाहतील. त्यांनी ते विधान करायला नको होतं, पण, शेवटी ते का बोलून गेले ते आम्हाला माहिती नाही. पण, नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही. त्या निवडणुकीत शरद पवार उभेच राहिले नव्हते, त्यामुळे शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे?' असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे.
तर पुढे अजित पवार म्हणाले की, 'या निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे उभ्या होत्या त्यामुळे पराभव या दोघींपैकी एकीचा होणार आहे, ते बोलले ते चुकीचं आहे. मी मान्य करतो. त्यांनी असं बोलायला नको होतं. जी व्यक्ती उभीच नाही. त्यांनी तुम्ही पराभूत करायचं म्हणता हो बरोबर नव्हतं', असंही ते पुढे म्हणालेत.
महायुतीने सुरुवातीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात बैठका घेतल्या होत्या. एका बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले, या बैठकीनंतर शरद पवार यांना बारामतीमधून संपविणार. बारामतीतून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मला कोणी विचारलं तर, चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यामुळेच ही परिस्थिती झाल्याची तक्रार मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे करणार आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केल्याची माहिती आहे. महायुतीच्या बैठकीमध्ये अजितदादांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजितदादांनी हे वक्तव्य गंमत म्हणून केल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. यासंबधीचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.