Eknath Shinde : OBC तरुणांचं उपोषण सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जावं; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

vijay waddetiwar
vijay waddetiwar
Updated on

मुंबई - जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीचं उपोषण आजअखेर थांबवण्यात राज्य सरकारला यश आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्या हस्ते सोडवलं. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महत्त्वपूर्ण आवाहन केलं.

vijay waddetiwar
एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, विधानसभा अध्यक्षांचे शिंदे-ठाकरे गटाला आदेश

विजय वडेट्टीवार म्हणाले की, उशीर केला पण उपोषण सुटलं याचा आनंद आहे, देर आये दुरुस्त आहे. मात्र आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, याबाबत समाजाला आश्वस्थ करण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

vijay waddetiwar
Sanjay Raut : ..तेव्हापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला ; राऊतांचा खळबळजनक दावा !

दरम्यान जिथं ओबीसी तरुण उपोषणाला बसले आहेत, तिथंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जावं आणि उपोषण सोडवावं. जागोजागी जावून उपोषण सोडवणं आणि आंदोलन थांबवणं हेच काम सरकरच राहिलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात काय चर्चा झाली हे माहित नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाज विरोध करत नाही. मात्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, आता दीड वर्ष झालं आहे. निवडणुकीला आता काही ८ महिनेच शिल्लक आहे. त्याआधी देतात की, पुन्हा पाने पुसतात, हे पाहावं लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.