Sugar Season Ajit Pawar
Sugar Season Ajit Pawaresakal

महाराष्ट्रातील साखर हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; अजितदादांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Sugar Season : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा साखर हंगाम १५ दिवस उशिरा सुरू होत आहे.
Published on
Summary

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र दोन लाख हेक्टरने घटले आहे. त्यामुळे कारखान्यांना चांगला ऊस मिळावा व हंगाम पूर्ण कालावधीत सुरू राहावा, अशीही मागणी उद्योगाची होती.

कोल्हापूर : कर्नाटकप्रमाणेच यावर्षी राज्यातील साखर हंगाम (Sugar Season) १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा साखर हंगाम १५ दिवस उशिरा सुरू होत आहे. त्यामुळे कारखान्यांची धुरांडी दिवाळीनंतरच (Diwali) पेटणार आहे. तथापि, तोडणी-ओढणी यंत्र आणून त्यांचे नियोजन करणे कारखान्यांसमोर आव्हान असेल.

Sugar Season Ajit Pawar
Vegetable Rate : कांदा 70 तर, बटाटा 40 रुपये किलो; भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ, इतर भाज्यांचे दर किती?

यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे ऊस पीकही जोमात आहे. राज्याच्या काही भागांत अजून मॉन्सून सुरू आहे, तर आठ-दहा दिवसांत परतीच्या पावसाची शक्यता आहे. अजूनही ऊस पिकात ओलावा आहे. त्यात पाऊस झाल्यास ऊस तोडणीत अडथळा निर्माण होऊ शकतो. या बाबींचा विचार करून हंगाम दिवाळीनंतर सुरू करावा, अशी मागणी साखर उद्योगांशी संबंधित संघटनांनी केलेली होती. त्या मागणीचा विचार करून हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय बैठकीत सर्वांनुमते घेण्यात आला.

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे क्षेत्र दोन लाख हेक्टरने घटले आहे. त्यामुळे कारखान्यांना चांगला ऊस मिळावा व हंगाम पूर्ण कालावधीत सुरू राहावा, अशीही मागणी उद्योगाची होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेला लागून असलेल्या कोल्हापूरसह सोलापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी कर्नाटकात जातो; पण कर्नाटक सरकारनेही यावर्षीचा हंगाम १५ नोव्हेंबरपासूनच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र महाराष्ट्र सरकारला दिले आहे.

Sugar Season Ajit Pawar
'धनगरांनी शेळ्या-मेंढ्या राखायचं बंद केलं, तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल' पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

त्यामुळेच राज्याचा हंगामही १५ नोव्हेंबरपासूनच सुरू करावा, अशी मागणी बैठकीत केली. त्यानुसार ही तारीख निश्‍चित केली गेली. या बैठकीत साखर आयुक्त कुणाल खेमणार व सहसंचालक मंगेश तिटकरे यांनी लिहिलेल्या एफआरपी महिती पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ‘विस्मा’चे बी. बी. ठोंबरे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.

जिल्ह्याची स्थिती

  • एकूण साखर कारखाने- २३ (१५ सहकारी, ८ खासगी)

  • गाळपासाठी उपलब्ध ऊस - १६० लाख टन

  • हंगामाचे संभाव्य दिवस - १२० ते १२५ दिवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.