Politics: ...आमच्यासाठी हे मोठे यश; अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवादावर वक्तव्य केले आहे. तसेच विरोधकांनाही उत्तर दिले आहे.
Amit Shah and Eknath Shinde during their meeting discussing seat-sharing and election strategies for the Maharashtra Assembly elections.
Amit Shah and Eknath Shinde during their meeting discussing seat-sharing and election strategies for the Maharashtra Assembly elections.esakal
Updated on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली अतिवादग्रस्त राज्यांमधील सुरक्षा आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ही खूप फलदायी चर्चा होती. अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत विकास आणि सुरक्षेवर चर्चा झाली, असं त्यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले की, 2026 पर्यंत बंडखोरी संपली पाहिजे. जेणेकरून PM मोदींचे विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी संपूर्ण देशातून नक्षलवादाचा नायनाट केला पाहिजे. आमच्यासाठी हे एक मोठे यश आहे की आम्ही येथे विकास केला आहे, रस्ते बांधले आहेत, येथे आरोग्य आणि शिक्षण सुविधा आहेत, येथे रोजगार आणि उद्योग आहेत. पूर्वी महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या 550 टीम होत्या. आज ते फक्त 55-56 आहे. खूप फरक आहे. मी म्हटलं आहे की, नक्षल भरती होत नाही. पोलीस त्यांना टार्गेट करत आहेत. सततच्या कामकाजात सर्वसामान्यांच्या जीवाचे आणि संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे एकीकडे सुरक्षितता आहे तर दुसरीकडे विकास आहे.

Amit Shah and Eknath Shinde during their meeting discussing seat-sharing and election strategies for the Maharashtra Assembly elections.
Politics: माझ्या मुलाला काय टार्गेट करता? माझ्याशी लढा, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांच्या टीकेवर बोलतान एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोधक पहिल्या दिवसापासून विरोध करत आहेत. ही योजना वाईट आणि केवळ निवडणुकीचा 'जुमला' आहे, असे ते म्हणत होते. ही योजना सुपरहिट झाल्यामुळे ते घाबरले होते. आमचे सरकार आहे जे आम्ही सांगतो ते करतो. मी त्यांना आव्हान देतो की त्यांनी २.५ वर्षात काय केले ते दाखवावे. जनता ठरवेल. जनतेने ठरवले आहे की महायुती पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल.

तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी पुन्हा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भाजप सरकार निवडणुका हरत असताना ही योजना लक्षात ठेवली आहे. राज्यात MVA सरकार स्थापन होईल आणि ते जास्त रक्कम देतील, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.