Latest Mumbai News: ‘‘राज्यातील वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहे. परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता झालेली आहे. भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून बहुमताने ‘मविआ’चे सरकार येईल,’’ असा विश्वास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याचे काम काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे. आतापर्यंत काँग्रेसने १७२ मतदारसंघांचा आढावा घेतला आहे. येत्या २५ तारखेपर्यंत सर्व २८८ मतदारसंघांचा आढावा पूर्ण होईल.’’ राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे.