Girish Mahajan : अखेर बहुप्रतीक्षीत खातेवाटप झाले! नाराजीवर भाजपनेते गिरीश महाजन म्हणाले...

Girish Mahajan
Girish Mahajan
Updated on

मुंबई - राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज अखेर पार पडले. मागील १० दिवसांपासून खातेवाटपाबाबत चर्चा सुरू होती. यामध्ये अजित पवार गटाला महत्त्वपूर्ण खाते मिळाले आहे. मात्र त्याचवेळी शिंदे गटातील नेत्यांची काही खाती काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र भाजपनेते गिरीश महाजन यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे.

Girish Mahajan
Congress : काँग्रेसला मिळालं लोकसभेचं टार्गेट; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

महाजन म्हणाले की, कोणाच्या मनात काही नाराजी नाही. माझ्याकडे तीन खाती का होती कारण मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. आता झाला आहे. पर्यटन माझ्याकडे आलं ते पण खातं चांगलं आहे. काम आपण प्रमाणिक करतो हे गरजेचं असत, असंही महाजन यांनी म्हटलं.

Girish Mahajan
Maharashtra Politics : 'त्या खलबत्त्यामध्ये चाणक्य अन् त्याची कूटनीती…', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

खातेवाटपात अजित पवार यांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं, हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खातं, छगन भुजबळ यांना अन्न नागरी पुरवठा खातं, धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन खातं देण्यात आलं. तर अनिल पाटील यांना मदत आणि पुनर्वसन, संजय बनसोडे यांना क्रीडा आणि महिला-बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी अदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

या खाते वाटपात शिंदे गटाच्या मंत्र्यांकडील तीन खाती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी ८ नेत्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.