एका ओळीचा काय? आम्ही पानभर अध्यादेश काढू, पण...; मराठा-कुणबी मुद्दावर महाजन यांचं विधान

girish mahajan
girish mahajan
Updated on

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दावर जालना जिल्ह्यात सुरू असलेलं आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. मात्र सरकार मुळ मागणीसाठी वेळ लागत असल्याचं सांगत आहे. मात्र मनोज जरांगे पाटील अध्यादेशावर ठाम आहेत. या अध्यादेशाबाबत सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

girish mahajan
Maratha Reservation: एक महिन्याचा वेळ कशाला हवा? ४ दिवसांचा वेळ पुरेसा; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

गिरीश महाजन म्हणाले की, एका ओळीचा अध्यादेश काय आम्ही पानभर अध्यादेश काढू. अध्यादेश हा विषय असा नाही की कॅबिनेट बैठक घेतली आणि विषय संपेल. मराठा आरक्षणासाठी आपण किती वर्षांपासून लढतोय आणि हे करताना आमच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळेस कसरत करुन आम्ही आरक्षण कोर्टात टिकवलं.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे आरक्षण टिकू शकलं नाही. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक, पॉझिटिव्ह आहे. मराठा समाजाची जी मागणी आहे, त्याला आमचं सरकारच न्याय देईल, असंही महाजन यांनी म्हटलं.

girish mahajan
Pankaja Munde : विधानसभा 2024 च्या निवडणुकीआधी अशीच यात्रा काढणार; पंकजा मुंडेंची घोषणा

दरम्यान समिती नेमून तीन महिने झाले आहे. आणखी थोडा वेळ लागतोय. मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. तरुणांना न्याय मिळणार आहे. मला वाटतं तीन महिने झाले म्हणून सर्व संपलेलं नाही. एक महिन्याची मुदत मुख्यमंत्र्यांनी आणि समितीने मागितली आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालल्याचं महाजन यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.