शेतकऱ्यांसाठी खुशखबर! उजनीतून शेतकऱ्यांना यंदा अतिरिक्त आवर्तन; समांतर जलवाहिनीनंतर सोलापूर शहरासाठी भीमेतून पाणी सोडणे होणार बंद; सध्या उजनीत १०६ टक्के पाणी

आगामी उन्हाळ्यात गरज पडल्यास उजनी धरणातून शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळण्याची आशा आहे. साधारणत: १० फेब्रुवारीपासून पहिले आवर्तन सोडले जाईल. तत्पूर्वी, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन निश्चित होणार आहे.
उजनी
उजनीesakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. त्यानंतर दरवर्षी सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून सोडावे लागणाऱ्या जवळपास २२ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात गरज पडल्यास उजनी धरणातून शेतकऱ्यांना एक आवर्तन जास्त मिळण्याची आशा आहे. साधारणत: १० फेब्रुवारीपासून पहिले आवर्तन सोडले जाईल. तत्पूर्वी, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटपाचे नियोजन निश्चित होणार आहे.

दरवर्षी उजनीतून रब्बी हंगामात जानेवारीत शेतीसाठी पाणी सोडले जाते. पण, यंदा चांगला पाऊस झाल्याने फेब्रुवारीत ते आवर्तन सुटेल. दुसरीकडे दरवर्षी सोलापूर शहरासाठी उन्हाळ्यात उजनी धरणातून प्रत्येक ५० दिवसांतून एकदा भीमा नदीद्वारे पाणी सोडावे लागते. पण, आता समांतर जलवाहिनी टाकली जात असून नोव्हेंबरअखेर ते काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील उन्हाळ्यात भीमा नदीतून पाणी सोडणे बंद होईल. ते पाणी नव्याने सुरू होणाऱ्या उपसा सिंचन योजनांसह शेतीसाठी वापरले जाईल.

धरणाचे आठमाही नियोजन असले तरीदेखील गरजेनुसार शेतीसाठी एक आवर्तन जादा सोडले जाण्याची शक्यता आहे. शहरासाठी नदीतून पाणी सोडावे लागत असल्याने धरणाची पातळी घटते आणि कॅनॉलमधून पाणी लवकर सोडावे लागते. धरण उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. आता भीमा नदीतून पाणी सोडणे बंद होणार असल्याने अशी वेळ येणार नाही. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी सोडणे शक्य होईल. त्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीत निश्चित होईल.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरेल नियोजन

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी टाकली जात आहे. त्यानंतर भीमा नदीतून प्रत्येकवेळी पाणी सोडणे बंद झाल्यावर धरणातील पाण्याचे नियोजन करणे सोयीचे होईल. १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन होणार आहे.

- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

आतापर्यंत उजनीतून सोडले ९० टीएमसी पाणी

जुलैअखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण अवघ्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने भरले. चार ऑगस्टपासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे सुरू झाले. आतापर्यंत उजनीतून तब्बल ९० टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही उजनीतून ३१ हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदी, कालवा, उपसा सिंचन योजना, बोगद्यातून सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.