Anil Parab : ''शिवसेनेने नोंदवलेली नावं बाद तर भाजपने नोंदवलेली नावं कायम'', अनिल परबांचा आक्षेप

आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली जात आहेत, असा आरोप अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर केला. शिवसेनेने नोंदवलेली नाव सर्व बाद केली आहेत आणि भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असंही परब म्हणाले.
Anil Parab
Anil Parab esakal
Updated on

मुंबईः पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या नोंदणीवरुन ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) नोंदवलेली नावं मतदार याद्यांमधून बाद झाली आहेत तर भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल परब म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आम्ही वर्षभर बोलत आहोत.निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असली तरी ती कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का? असा प्रश्न पडतोय. निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढले आहेत.

Anil Parab
Team India Schedule: टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर! 'या' दिवशी रंगणार पुणे, मुंबई अन् नागपूरमध्ये महत्त्वाचे सामने

परब पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या आदेशावरून काम करत असल्याचं आम्हांला दिसलं आहे. पदवीधर निवडणुकीत आयोग म्हणतं की, जास्त नोंदणी करा.. आम्ही नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही हजारो नावं नोंदवली होती, तेव्हा ते चेक केल जातं आणि मग आम्हांला स्लिप दिली जाते. अर्ज जेव्हा नाकारले जातात तेव्हा ते तिकडेच परत दिले जातात. काही तरी कारणं असतील तर सांगितली जातात लगेच.

आमच्या पक्षाची नावं ठरवून बाद केली जात आहेत, असा आरोप अनिल परब यांनी निवडणूक आयोगावर केला. शिवसेनेने नोंदवलेली नाव सर्व बाद केली आहेत आणि भाजपने नोंदवलेली नावं कायम आहेत, असंही परब म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.