Sanjay Raut: 'नवे राष्ट्रपिता मोदींनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?'

अमृता फडणविसांनी महात्मा गांधी जुन्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे म्हटले होतं
Sanjay Raut
Sanjay RautEsakal
Updated on

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात महात्मा गांधी जुन्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे म्हटले होते. अमृता फडणवीस यांच्या या व्यक्तव्यानंतर यांच्यावर चांगलीच टीकाही झाली होती. राष्ट्रपित्याच्या या वादामध्ये आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उडी घेत अमृता फडणवीस यांना थेट प्रश्न केले आहेत.

नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत असं म्हंटल्यानंतर नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतला होता?, असा थेट प्रश्न करत संजय राऊत यांनी अमृता फडणवीस यांची कानउघाडणी करत मोदी सरकारवरतीही टीका केली आहे.

तर "देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही." खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे. पण चिडून, संतापून, आदळआपट करून काय उपयोग? खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाने करायला हवा, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी शिवसेनेच्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून लगावला आहे.

Sanjay Raut
Sharad Pawar: आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवार म्हणाले...

रोखठोक मधून संजय राऊत म्हणतात की, खरगे यांनी भाजपचा कुत्रा काढला. त्या कुत्र्यावरून संसदेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते असलेले खरगे हे गेल्या आठ दिवसांपासून तवांगमधील चीनच्या घुसखोरीवर चर्चेची मागणी करीत आहेत. त्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा नाकारली जाते. पण खरगे यांनी ‘छू’ केलेल्या कुत्र्यावर मात्र भाजपचे मंत्री संसदेत खडाजंगी करतात.

Sanjay Raut
Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

अमृता फडणवीस हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यांची मते त्या मांडत असतात. आता त्यांनी एक मत मांडले, ”आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत!”सौ. फडणवीस यांचे स्वतंत्र विचार असू शकतात आणि एक नागरिक म्हणून त्यांना आपली मते मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण सौ. फडणवीस यांनी मांडलेल्या विचारांशी त्यांचा पक्ष सहमत आहे काय? असा प्रश्नही यामध्ये विचारण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.