Jitendra Awhad : शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी; जितेंद्र आव्हाड यांचं विधान

Jitendra Awhad
Jitendra Awhadesakal
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दांवर भाष्य केलं.

Jitendra Awhad
शेतकरी आत्महत्यांबद्दल केंद्रेकरांनी सादर केलेल्या अहवालावर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले...

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकिकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आल्याची टीका आव्हाड यांनी केली.

Jitendra Awhad
Cabinet Meeting : "राऊत नाहीत का आले?"; मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषदेदरम्यान विचारणा, अन्...

यावेळी त्यांनी गणेशोत्सवात लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली. गणेशोत्सवात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवा.

दरम्यान कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्‍त रेल्वे गाड्या सुरू करा, यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.