Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं

Published on

मुंबईः मुंबईमध्ये शनिवारी महायुतीचा मेळावा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नेते आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महायुतीच्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. राजकारणात कधीकधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, लोकसभेत मविआ म्हणतंय आमचा विजय झाला.. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकू शकलं. मात्र आपण निर्धार केला आणि किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील.

Devendra Fadnavis : ''प्रवक्त्यांना फारच खुमखुमी असेल तर...'', महायुतीच्या मेळाव्यात फडणवीसांनी वाचाळवीरांना फटकारलं
Rahul Dravid : विश्‍वविजेत्या संघाच्या माजी प्रशिक्षकांनी उलगडले यशाचे रहस्य

फडणवीस पुढे म्हणाले की, लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत, ते खोटं बोलत होते मात्र आपणही गाफील राहिलो होतो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागणार आहे, सत्य चिरकाळ जिवंत राहतं..असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल, दुसरी नव्हे. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागली असून विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही? असा प्रश्न आहे.

''लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेल, लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत.'' असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

प्रवक्ते काय बोलताएत ते बघा- फडणवीस

''सर्वपक्षीयांना सांगतो की एकमेकांमध्ये विसंवाद आहे.. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. खुमखुमी असेल तर नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा.'' असं म्हणत त्यांनी वाचाळवीर प्रवक्त्यांना खडसावलं. यावेळी फडणवीसांनी अटल बिहारी वाजपेयी यांची 'कदम मिलाकर चलना होगा' या कवितेची आठवण उपस्थितांना करुन दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.