Manoj Jarange : २८८ आमदार निवडून आणायचे की पाडायचे? जरांगेंचा फैसला? भूमिका केली स्पष्ट...

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांनी थोडी सावध भूमिका घेत १३ तारखेला याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. २८८ जागा लढायच्या की पाडायच्या, याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याचा कायदा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
manoj jarange laxman hake
manoj jarange laxman hakeesakal
Updated on

Maratha Resrvation : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतली आहे. दुसरीकडे मात्र ओबीसींच्या नेत्यांनी वज्रमूठ आवळली असून सगेसोयऱ्याच्या मुद्द्याला विरोध केला आहे. त्यामुळे सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असून मनोज जरांगे यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीबद्दल भूमिका घेणार असल्याचं म्हटलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही प्रत्यक्ष भूमिका घेतली नव्हती. तरीही त्यांनी 'ज्याला पाडायचं त्याला पाडा' असा संदेश दिला होता. त्यामुळे मराठवाड्यातल्या आठही जागांवर आणि इतर काही जागांवर जरांगे फॅक्टरने काम केलं.

manoj jarange laxman hake
Sambhaji Nagar : १६ लाख २० हजार हेक्टरवर ,खरिपाची पेरणी जून संपत आला, तरीही मराठवाड्यात मोठा पाऊस नाही

येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांनी थोडी सावध भूमिका घेत १३ तारखेला याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. २८८ जागा लढायच्या की पाडायच्या, याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याचा कायदा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजी नगर येथे मनोज जरांगे पाटील उपचार घेत होते. मंगळवारी त्यांन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट आंतरवाली सराटीत गेले आणि उपस्थितांना संबोधित केलं. छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. राज्यामध्ये मराठा आणि ओबीसींच्या दंगली घडवण्याचं छगन भुजबळ यांचं स्वप्न आहे, पण ते आपल्याला पूर्ण होऊ द्यायचं नाही.. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल आणि ओबीसी नेत्यांबद्दल बोलताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन त्यांनी केलं.

manoj jarange laxman hake
Sambhaji Nagar : उद्योजक-पोलिसांत राखणार समन्वय;‘मसिआ’च्या वाळूज येथील कार्यालयात संयुक्त बैठक

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, १९६७ मध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं. उर्वरित समाजाला १९९४मध्ये मिळालं. मात्र मराठ्यांना १८८४ पासून म्हणजे दीडशे वर्षांपासून कुणबी हे ओबीसीतलं आरक्षण आहे. ओबीसींच्या यादीमध्ये ८३ क्रमांकावर कुणबी जात आहे.. आणि कुणबी-मराठा, मराठा-कुणबी एकच आहेत. म्हणूनच २००४ चा जीआर दुरुस्त करुन मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.