Satej Patil : 'शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग म्हणजे सरकारची लाडका कंत्राटदार योजना'

MLA Satej Patil : शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या महापुरात आणखी भर पडणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
MLA Satej Patil Shaktipeeth Highway
MLA Satej Patil Shaktipeeth Highwayesakal
Updated on
Summary

‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग (Goa to Nagpur Shaktipeeth Highway) केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या डोक्यातून जात नाही.'

कोल्हापूर : राज्यातील बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांवर अन्याय करत, जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा, पर्यावरणास हानी पोहोचवणारा व कंत्राटदारांचे खिसे भरणारा गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग महायुती शासन पुढे रेटत आहे. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारची लाडका कंत्राटदार योजना आहे. शक्तिपीठ पूर्णपणे रद्द व्हावा, यासाठी १२ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिली.

शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीतील ५९ गावांमधील शेतकरी प्रतिनिधींची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग (Goa to Nagpur Shaktipeeth Highway) केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या डोक्यातून जात नाही. शेतकऱ्यांमधून प्रचंड विरोध होत असताना हा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग रेटला जात आहे.

MLA Satej Patil Shaktipeeth Highway
Kolhapur Landslide : कोल्हापुरातील 89 ठिकाणांना भूस्खलनाचा धोका; वायनाड दुर्घटनेमुळं विषय ऐरणीवर, खबरदारी घेण्याची गरज

तीन महिन्यांपासून याविरुद्ध आंदोलन होत आहे. मात्र, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री दादा भुसे यांनी हा महामार्ग रद्द न करता व शेतकऱ्यांना कोणत्याही चर्चेला न बोलवता तोंडी स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते, पण त्यांचा खोटेपणा काही दिवसातच उघड झाला आहे. विधानसभेमध्ये मंत्री भुसे हे सपशेल खोटे बोलले आहेत. ज्या दिवशी वर्तमानपत्रातून या महामार्गाला स्थगिती दिली आहे, असे जाहीर केले होते तेव्हापासूनच गावागावांमध्ये भूसंपादनाच्या नोटीस ग्रामपंचायतींमध्ये येत आहेत. आता शेतकरी सरकारला सळो की पळो करून सोडतील.’

फोंडे म्हणाले, ‘आंदोलन तीव्र करण्यासाठी १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची मोट बांधून कोल्हापुरात राष्ट्रीयस्तरावरच्या संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना घेऊन तसेच राज्यस्तरावरील राजकीय पक्षांच्या सर्व नेत्यांना घेऊन राज्यव्यापी परिषद घेतली जाणार आहे. तुळजापूर येथे शेतकऱ्यांचे साखळी उपोषण होईल.’ शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, गोकुळ संचालक प्रकाश पाटील, के. डी. पाटील उपस्थित होते.

MLA Satej Patil Shaktipeeth Highway
'छत्रपती शिवरायांनी शहाजीराजेंच्या निधनानंतर जिजाऊंना सती प्रथेपासून परावृत्त केलं' : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

‘शक्तिपीठ’मुळे महापुरात भर पडणार

कोल्हापुरात महापूर आला. त्याचा नागरिकांना व शेतीला फटका बसला. विविध रस्त्यांचे बांधकाम हे एखाद्या बंधाऱ्यासारखे केले आहे. त्यामुळे पुराचा फटका बसला. महापुरामध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना व नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. यातच शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरच्या महापुरात आणखी भर पडणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.