Raj Thackeray on Maharashtra Farmers: गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला आहे. धरणांचा पाणीसाठा वाढला असला तरी शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आता सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहेत. आता याच प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी यासंदर्भात 'एक्स'वर पोस्ट करत सरकार आणि मनसैनिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.