विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. भ्रष्टाचारी आणि शिवद्रोही सरकारला हटवायचं हेच टार्गेट आहे. अनाजी पंतांसारखे जे वागत असतील त्यांना ते गाणं लागलं असेल. सतत दिल्लीवारी बेरात्री होत आहेत अशी चर्चा आहे. काही लोक कर्ज काढून सरकार दिवाळी साजरी करत आहेत. राज्य सरकारने कटोरा घेऊन फिरायचं काम सुरू केलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले की, हे सरकार जिकडे जाते तिकडे उधारी करुन ठेवत आहे. दाओसला गेले तिकडे उधारी करुन ठेवली. त्या सरकारने नोटीस पाठवली हे वाईट. कंत्राटदारांचे पैसे असतील किंवा अजून काही. हे सरकार खोके सरकार आणि कमिशन सरकार आहे. राज्याला कायम बदनाम करायचं काम महायुती सरकारने केले आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत.
बायका त्यांच्या आणि सत्तार साड्या वाटतात? ते कोणत्या भाषेत बोलले ते समजत नाही. भाजप काही बोलू शकत. कोणाच्या बायका आणि साड्या कोणाच्या. महिलांनी आता या सरकारची होळी करायचा निर्णय घेतला आहे. तोच संदेश साड्या जाळून दिला आहे. महायुतीत काय होणार ते थोड्या दिवसात समजेल, असं ते म्हणाले आहेत.
हिंदुत्वाचं राजकारण नुसत मतांसाठी करणार का? अब्दुल कलाम यांच्यासारखे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप असं जातीय तेढ निर्माण करतात आणि देशाला तोडण्याचे काम करतात. पण हे हिंदू आणि मुस्लिम सर्वांना समजलं आहे. महायुती मध्ये महाभारत सुरु आहे. देशात परिवर्तनाची लाट आहे. सत्याची कधी हार होणार नाही. असत्याची वेळ होती पण आता सत्याची वेळ येणार. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये चांगले निकाल येणार आहेत. तर त्यापेक्षा महाराष्ट्रात चांगले निकाल येणार आहेत असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.