सकाळ वृत्तसेवा
latest Vidarbha News: रागाच्या भरामध्ये अथवा भांडणादरम्यान परस्परांना आई-बहिणीवरून शिव्याची लाखोली वाहिली जाते. अनेकदा किरकोळ शिवी देखील एखाद्या मोठ्या गुन्ह्याला जन्म देऊ शकते. स्थलकालपरत्वे शिव्यांचे स्वरूप बदलत जाते पण त्यांचा विषारीपणा कायम राहतो.
शिव्यांमुळे स्त्रियांचा अवमान तर होतोच पण त्यामुळे विखारही वाढतो. आता हाच शिव्यांचा प्रसार रोखण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ मंडळी सरसावली आहेत. त्यासाठी ‘शिव्यामुक्त समाज अभियान’ सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, या अभियानाची दखल घेत राज्यातील तब्बल सहा विद्यापीठांनी ‘शिव्या बंदी’चे परिपत्रक जारी केले आहे.