शेतकऱ्यांना वीजबिल माफी! एप्रिल ते जूनचे शेतीपंपांचे बिलिंग थांबविले; सोलापूर जिल्ह्यातील ‘एवढ्या’ शेतकऱ्यांचे ४८०० कोटींचे बिल होणार माफ, दिवसा वीज, कधीपासून?

राज्य सरकारने शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला, पण अद्याप शासन निर्णयाची प्रतीक्षाच आहे. अधिवेशनात घोषणा केल्याने त्यासंबंधीचा शासन निर्णय निघेल म्हणून ‘महावितरण’ने एप्रिल ते जून या महिन्यातील बिलाचे प्रिंटिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
Electricity bill
Electricity billesakal
Updated on

सोलापूर : राज्य सरकारने शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला, पण अद्याप शासन निर्णयाची प्रतीक्षाच आहे. राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केल्याने त्यासंबंधीचा शासन निर्णय निघेल म्हणून ‘महावितरण’ने एप्रिल ते जून या तीन महिन्यातील बिलाचे प्रिंटिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात तीन लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडे कृषीपंप आहेत. त्यापैकी अवघे २५ हजार शेतकरी नियमित वीजबिल भरतात आणि उर्वरित शेतकऱ्यांकडे वीजबिलाची थकबाकी आहे. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील जवळपास तीन लाख शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींची वीजबिल माफी मिळेल, अशी स्थिती आहे. दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या वीजबिल माफीचा निर्णय पावसाळी अधिवेशनात झाला, पण त्याचा शासन निर्णय अजून निघालेला नाही. पण, शासनाकडून या आठवड्यात निर्णय निघेल म्हणून तीन महिन्याच्या बिलिंगची छपाई ‘महावितरण’ने थांबविली आहे. दरम्यान, एकदा वीजबिल माफी झाल्यानंतर पुन्हा मात्र नियमित वीजबिल भरावे लागणार आहे.

दिवसा विजेसाठी १०,५०० एकर जमिनीची गरज

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून राज्य स्तरावरून नियोजन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी सात एजन्सी नेमल्या आहेत. दिवसा वीज शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ‘महावितरण’ला साडेदहा हजार एकर जमीन लागणार आहे. आतापर्यंत ‘महावितरण’ला दोन हजार ७० एकर शासकीय जमीन मिळाली आहे. अजूनही साडेआठ हजार एकर जमीन लागणार असून त्यात बहुतांश जमीन खासगीच असणार आहे. शेतकऱ्याला हेक्टरी वार्षिक ५० हजार रुपयांचे भाडे मिळणार आहे. हन्नूर (ता. अक्कलकोट) व मानेगाव (ता. माढा) येथील शेतकऱ्यांना सौर ऊर्जेतून दिवसा वीज दिली जात आहे.

ठळक बाबी...

  • एकूण शेतकरी ग्राहक

  • ३.९२ लाख

  • शेतकऱ्यांकडील एकूण थकबाकी

  • ४,८०० कोटी

  • दिवसा विजेसाठी जमिनीची गरज

  • १०,५०० एकर

  • सध्या मिळालेली जमीन

  • २,०७० एकर

शेतकऱ्यांना आता नियमित बिल

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, त्यांना रात्रीचा त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासकीय व खासगी जमीन घेतली जाणार असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात मिळालेल्या दोन हजार ७० हेक्टर जमिनीवर सौर पॅनल टाकले जाणार आहेत. दिवसा वीज सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमित वीजबिल भरावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com