हे पक्ष जनतेचे नाही तर...; आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्ष अन् जातींची नावे घेत आंबेडकरांचा राज्यातील 'या' नेत्यांवर हल्लाबोल

Prakash Ambedkar On aarkshan bachav yatra : राजकीय पक्षांच्या भूमिका पहिल्या तर हे राजकीय पक्ष महत्वाच्या मुद्यावर भूमिका घेतं नाहीत. मागेही कोपर्डीच्या वेळी सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते, असेही आंबेडकर म्हणाले आहेत.
Prakash Ambedkar On aarkshan bachav yatra
Prakash Ambedkar On aarkshan bachav yatra
Updated on

मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील बऱ्याच दिवसांपासून पेटलेला आहे. या मुद्दयावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावर कुठलीही भूमिका घेत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी आंबेडकरांनी शरद पवार, अजित पवार यांची नावे घेत राज्यातील प्रत्येक पक्ष हा ठराविक जातींचा पक्ष असल्याचे देखील म्हटले आहे.

राजकीय पक्षांच्या भूमिका पहिल्या तर हे राजकीय पक्ष महत्वाच्या मुद्यावर भूमिका घेतं नाहीत. मागेही कोपर्डीच्या वेळी सर्व राजकीय पक्ष मौन बाळगून होते. आता ही ओबीसी-मराठा वाद आहे आणि हे मौन बाळगून आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपने, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेना किंवा काँग्रेस यांनी कोणीच भूमिका घेतली नाही.

हे पक्ष जनतेचे नाही. हे पक्ष आपल्या जातीचे पक्ष आहेत. श्रीमंत मराठा हा शरद पवार- अजित पवार आणि कांग्रेस यांचा पक्ष... तर कायस्थ ब्राह्मण म्हणजे उद्धव सेना, भाजप... त्यामुळे उद्यापासून आम्ही आरक्षण बचाव यात्रा काढत आहोत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar On aarkshan bachav yatra
Manoj Jarange : राज्याचे मुख्यमंत्री व्हा अन्... मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दरेकरांचे जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर

आरक्षण बचाव यात्रेचा मार्ग

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात ही यात्रा चैत्यभूमीवरुन संपूर्ण राज्यभर काढण्यात येणार आहे. चैत्यभूमीपासून सुरु करून गणेश मंदिर, कोतवाल उद्यान, भिडे वाडा आणि कोल्हापुरात थांबणार आहोत. सातारा, सांगली, बीड, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद असे अनेक जिल्हे करत आम्ही औरंगाबादला जाहीर सभा घेऊन समारोप करू असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

Prakash Ambedkar On aarkshan bachav yatra
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटातही घोळ; केंद्राने पुणे पोलिसांकडे मागितली माहिती

उद्देश काय?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश हाच आहे की ओबीसी घाबरला आहे, माइक्रो ओबीसी तर खूप घाबरला आहे. नाविक समाज दुकान चालवितो पण त्याचे ही नुकसान होत आहे. गंभीर परिस्थिती आहे.

महाराष्ट्रात सलोख्याचे वातावरण राहवं म्हणून आम्ही १४ दिवसाचा मार्च काढणार आहोत. सेन्सिटिव भागातून ही आम्ही हा मार्च नेणार आहोत. प्रचार अपप्रचार संधार्भातील जागृती आम्ही लोकांमध्ये आणून शाश्वत व्यवस्था आणण्याचे काम करणार आहोत. आमच्यासोबत अनेक ओबीसी संघटना जुळत आहेत. आम्ही अनेकांना पत्र ही लिहिले आहे. आमचा हेतू हा शांततेचा हेतू आहे. अद्याप शरद पवार किंवा कोणाकडून ही प्रतिक्रिया आली नाही असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सरळ भूमिका घ्यायला राजकीय नेते घाबरतात, करण त्यांना त्यांचे नुकसान होईल असे वाटते. पण लोकांना दिशा देणारे कोणी नाही असेही आंबेडकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com