राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवारांनी पक्षाशी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय गोंधळ निर्माण झाला. अजित पवारांच्या या बंडामुळे एक वर्षाआधी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आठवण महाराष्ट्राच्या जनतेला झाली. अजित पवारांच्या बंडाबद्दल संजय राऊत यांना विचारले केली असता त्यांनी त्यांचे मत मांडले.
भारतीय जनता पक्षाला विविध पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा मिळतोय, याला काही भाजप नेते 'मास्टरस्ट्रोक' म्हणत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, " यांनी चक्क अंपायरच फोडलाय. दोन तास ED आणि CBI यांसारख्या एजन्सी आमच्या हातात द्या. २०२४ला आम्ही देखील मास्टरस्ट्रोक खेळू. आम्ही देखील मास्टरस्ट्रोक वर मास्टरस्ट्रोक मारु."
समान नागरी संहितेवर मांडले मत
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की," समान नागरी संहितेचा विषय भारतीय जनता पक्षाने सुरु केलाय. त्यांच्याकडील सर्व विषय संपलेले आहेत.मला वाटत देशामध्ये प्रत्येकासाठी कायदा समान आणि एक असला पाहिजे.
आपल्या देशात प्रत्येक धर्माचा वेगळा कायदा आहे. मात्र, या कायदा कोणत्या एका धर्मासाठी नसून तो देशासाठी आहे. . यावरील भूमिका आम्ही कायद्याचा मसूदा आल्यावर स्पष्ट करु."म्हणजेच समान नागरी कायद्याला मसूदा आल्यानंतर पक्षाची भूमिका ठरणार, असे राऊत यांच्या मतावरुन स्पष्ट झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.