Sanjay Raut : ..तेव्हापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला ; राऊतांचा खळबळजनक दावा !

Sanjay Raut
Sanjay Raut esakal
Updated on

Sanjay Raut : ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला,’’ असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजांत संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील वातावरण असे कधीच नव्हते.

Sanjay Raut
Sanjay Raut : विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचा घणाघात

अस्थिर आणि असुरक्षित जातीपातींमध्ये वाटलेले सध्याचे वातावरण आहे. या सर्वाला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. राज्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांनी एकसंध ठेवले. परंतु, गेल्या दहा वर्षांत या परिस्थितीत बदल झाला आहे. जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut
Sanjay Raut News: गद्दार गेले, 10 आमदार निवडून आणू! : संजय राऊत

देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असे सांगत होते. हेच फडणवीस महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार असताना आमची सत्ता आली तर मराठा समाजाला २४ तासांत आरक्षण देऊ, असे सांगत होते. मग फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत?

- संजय राऊत, खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.