Free Electricity : कृषीपंपाना मोफत विजेचा अध्यादेश अखेर जारी

राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी साडेसात अश्‍वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्ती असलेल्या पंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे.
Free Electricity
Free Electricitysakal
Updated on

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी साडेसात अश्‍वशक्तीपेक्षा कमी अश्वशक्ती असलेल्या पंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्याचे बिल सरकार चुकते करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यात ६० लाखाहून अधिक कृषीपंपधारक असून त्यांच्याकडे सुमारे ६० हजार कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अधिवेशनात मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. त्याचा अध्यादेश कधी निघणार, मोफत वीज कधीपासून लागू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते.

अध्यादेशानुसार १ एप्रिल २०२४ पर्यंत पुढे पाच वर्षांसाठी ही मोफत वीज असणार आहे. भरपाईपोटी सरकार १४ हजार ७६० कोटी रुपये महावितरणला देणार आहे. या योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेऊन निधीची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ अशा वेगवेगळ्या संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार हलका होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.