केंद्राच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होवू शकतो; नाना पटोलेंचा दावा

Nana Patole on Narendra Modi
Nana Patole on Narendra Modi
Updated on

नवी दिल्ली - केंद्र सरकारने पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे. या आधिवेशनात महत्त्वपूर्ण विधेयक आणण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून अनेक दावे प्रतिदावे कऱण्यात येत आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे.

Nana Patole on Narendra Modi
Manoj Jarange : ''गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो, पण...'', जरांगे पाटील उपोषण सोडणार का?

काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन कऱण्यात आआहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वात भंडारा शहरात ही यात्रा काढण्यात आली होती. यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं की, देशात एक देश एक निवडणुकीचे काँग्रेस समर्थनच करणार आहे. मात्र ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दुर केला पाहीजेत. जगाच्या पाठिवर आज सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात.

Nana Patole on Narendra Modi
मनोज जरांगे यांच्या निस्वार्थीपणाची CM शिंदेंनी दिली ग्वाही पण केली ' ही' विनंती

दरम्यान मुंबईला केंद्रशासित करण्याचा आणि महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप करताना नाना पटोले म्हणाले की, केंद्राच्या पाच दिवसाच्या अधिवेशात मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. केंद्राचे हे विशेष अधिवेशन देशाची काय राखरांगोळी करून जाईल, हे आताच सांगता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते म्हणाले की, आरक्षण देण्याचे अधिकार राज्याचे नाही. आता केंद्राचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी केंद्राला ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठविण्याची मागणी करावी, असंही पटोले यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.