Uddhav Thackeray: खतांच्या पिशव्यांवर नरेंद्र मोदींचा फोटो का? उद्धव ठाकरेंचे शरसंधान, खोके सरकारने सुपारी घेतल्याची टीका

Uddhav Thackeray News: आरसीएफ कर्मचारी सेना नूतन कार्यालय उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे. त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayESakal
Updated on

मुंबई: राज्यातील संकट अद्याप गेलं नाही आहे. संकट अजून समोर उभं राहत आहे. कारण आताचं खोके सरकार आहे. तसेच या खोके सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मुंबईचा माणूस हद्दपार झाला पाहिजे, अशी या सरकारने सुपारी घेतली आहे. मात्र आता हे फक्त २ ते ३ महिने चालणार आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिंदे सरकावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.