Amit Shah: शरद पवार सरदार तर अजितदादा कोण? बच्चू कडूंचा सवाल; म्हणाले, अंगलट...

Bachchu Kadu : अमित शहांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शाह यांच्या तोंडातून चुकीने ते शब्द निघाले असतील, ते विसरभोळे आहेत.. बऱ्याचदा अमित शाह चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या ते अंगलट येतं. असं म्हणत बच्चू कडूंनी शाहांना कोपरखळ्या मारल्या.
Amit Shah
Amit Shahesakal
Updated on

अमरावतीः भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन पुण्यात संपन्न झालं. या अधिवेशनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. यावेळी अमित शाहांनी बोलताना, शरद पवारांना 'भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार' असा उल्लेख केला होता. त्याला उत्तर देताना बच्चू कडू यांनी कोपरखळी मारली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

शरद पवार हे भ्रष्टाचारावर बोलत आहेत, भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा सरदार भारताच्या राजकारणात कोण असेल तर ते शरद पवार आहेत.. याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय? देशातल्या कोणत्याही सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला संस्थात्मक पद्धतीने करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते शरद पवार तुम्ही केलं आहे. मी 'डंके की चोट पर' हे सांगतो. तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. तुमचं खोटं इथं चालणार नाही, घरोघरी जावून या खोट्याबद्दल माहिती द्यायची आहे असेही शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Amit Shah
Economic Survey: भारत 'या' क्षेत्रात चीनची जागा घेऊ शकत नाही; आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय सांगितलं आहे?

बच्चू कडूंच्या कोपरळ्या

अमित शहांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेवर बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, शरद पवार जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील तर मग अजितदादा कोण आहेत? अमित शाह यांच्या तोंडातून चुकीने ते शब्द निघाले असतील, ते विसरभोळे आहेत.. बऱ्याचदा अमित शाह चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या ते अंगलट येतं. असं म्हणत बच्चू कडूंनी शाहांना कोपरखळ्या मारल्या.

Amit Shah
माजी सैनिकाने ६ महिन्यांच्या चिमुरड्यासह कुंटुंबातील ५ जणांना संपवलं; धक्कादायक कारण आलं समोर

दरम्यान, शरद पवारांवर टीका करताना अमित शाह पुढे म्हणाले की, जे आज महाराष्ट्राच्या विकासावर बोलत आहेत, आज मी त्यांना विचारतो, दहा वर्ष महाराष्ट्रात तुमचे सरकार होते. केंद्रातदेखील तुमचे सरकार होते तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं? हिशोब द्या? खोट्या आश्वासनाशिवाय काही दिलं नाही. युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्राला फक्त एक लाख ९१ हजार कोटी मिळाले होते. नरेंद्र मोदींनी दहा वर्षात १० लाख पाच हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. पवार साहेब हिशोबावर विश्वास नसेल तर पुण्यातील कोणताही चौक निवडा आमचे मुरलीधर मोहोळ हिशोब घेऊन उभे राहतील, असेही अमित शाह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com