Varsha Gaikwad : ‘स्मार्ट मीटरचे कंत्राट अदानींना का?’

‘‘मुंबईतील बेस्टचे कर्मचारी विजेचे स्मार्ट मीटर लावण्यासाठी सक्षम असताना यासाठीचे कंत्राट अदानी समूहाला देण्याचे कारण काय,’’ असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत केला.
Varsha Gaikwad
Varsha Gaikwadsakal
Updated on

‘‘मुंबईतील बेस्टचे कर्मचारी विजेचे स्मार्ट मीटर लावण्यासाठी सक्षम असताना यासाठीचे कंत्राट अदानी समूहाला देण्याचे कारण काय,’’ असा सवाल काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत केला.

नियम ३७७ नुसार शून्य तासात हा मुद्दा खासदार गायकवाड यांनी उपस्थित केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘मुंबईत वीज पुरवठा बेस्टमार्फत केला जातो. केंद्र सरकारने आरडीएसएसअंतर्गत ३५०० कोटी रुपये बेस्टला मंजूर केले आहेत. बेस्टच्या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.

बेस्टतर्फे ९९ टक्के विजेचा आकार वसूल केला जात आहे तसेच बेस्टची वीजहानीसुद्धा पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. बेस्ट देशात सर्वोत्तम काम करत असताना आधुनिकीकरणासाठी स्मार्ट मीटर लावण्याचे काम केंद्र सरकारने अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मीटरची किंमत १३ हजार रुपये लावण्यात आहे.

यावर केंद्र सरकार केवळ १५ टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे एवढे महाग मीटर लावण्याचे औचित्य नाही. हे स्मार्ट मीटर लावण्याचे १८०० कोटी रुपयांचे कंत्राट अदानी समूहाला देण्याचे कारण काय?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बेस्टकडे चांगले तंत्रज्ञ असताना अदानी समूहाला हे काम देण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे खासदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.