Ranjana Deshmukh: एका अपघातानं करियरही गेलं आणि प्रेमही.. पण अनंत आठवणी देऊन गेल्या रंजना..

ज्येष्ठ अभिनेत्री रंजना देशमुख यांचा आज 23 वा स्मृतिदिन..
veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death
veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death sakal

ranjana deshmukh death anniversary: अभिनेत्री रंजना.. म्हणजे रंजना देशमुख. ही अभिनेत्री आज जरी आपल्यात नसली तरी त्यांना आपण आजही विसरू शकलो नाही. रंजना यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसाच नव्हे तर एक अढळ जागा निर्माण केली होती.

'बिनकामाचा नवरा', 'मुंबईचा फौजदार', 'असला नवरा नको ग बाई', 'सासू वरचढ जावई' असे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी केले. आज त्या असत्या तर त्यांचे कार्य हे एखाद्या पुस्तकात ही सामावले नसते.

परंतु 3 मार्च 2000 साली त्यांचे अकाली निधन झाले आणि त्या आपल्यातून गेल्या आणि त्यांची जागा कायमची रिकामी झाली. पण आता त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्याचे कारण म्हणजे आज त्यांचा 23 वा स्मृतिदिन.. त्या निमित्ताने पाहूया यांचा थोडक्यात जीवनपट.. (veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death )

veteran actress ranjana deshmukh death anniversary her movies career love life accident death
Jaya Bachchan video: धक्काच! सतत चिडणाऱ्या जया बच्चन चक्क प्रेमाने वागल्या आणि पापराजी चक्रावले..

रंजना या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या होत्या तर प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या त्यांच्या मावशी होत्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 

रंजना यांनी व्ही. शांताराम निर्मित दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर 'झुंज' या चित्रपटात रंजना यांनी मुख्य नायिकेची भूमिका साकारली.

अरे संसार संसार, गुपचूप या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा, चानी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या.

केवळ सिनेमाचनाही तर नाट्य विश्वातही रंजना यांनी खूप यश मिळवले. त्यांना ऐंशीच्या दशकात त्यांचा हात धरणारी एकही अभिनेत्री नव्हती. पण एका अपघाताने त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले.

रंजना १९८७ मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगलोरला जात होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी जाले. त्यांचा डावा हातही निकामी झाला. त्यावेळी रंजना केवळ ३२ वर्षांच्या होत्या. रंजना या अपघातानंतर आयुष्याची शेवटची १३ वर्षं ही व्हीलचेअरवर काढली. 

असं म्हणतात की रंजना आणि अशोक सराफ यांच्या प्रेमाचे नाते होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. ते एकमेकांशी लग्नही करणार होते. परंतु रंजना यांचा अपघात झाला आणि त्यांचे प्रेमही तिथेच थांबले. पुढे रंजना खचत गेल्या आणि २००० मध्ये परेल येथील त्यांच्या घरी वयाच्या ४५ व्या वर्षी त्यांचे हृदय विकाराने निधन झाले.

अपघातानंतर त्या अभिनयक्षेत्रापासून दूरच राहिल्या. पण त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षं आधी त्यांनी फक्त एकदाच या नाटकात काम केले होते. या नाटकातील त्यांची भूमिका ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे त्या नाटकाचे कथानक होते. हे नाटक हे रंजना यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित होते असे म्हटले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com