Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव कोणी सुचवलं? दिग्दर्शक केदार शिंदेंनीच केला खुलासा

बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं "मंगळागौर"
who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed
who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealedSAKAL
Updated on

Baipan Bhaari Deva News: बाईपण भारी देवा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा पहायला केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही गर्दी केली.

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफीसवर लहानांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय. सिनेमाचं नाव एकदम भारी आहे.

पण हे नाव कोणी दिलंय, यामागे एक महत्वाचा खुलासा झालाय. बाईपण भारी देवा सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनीच या गोष्टीचा खुलासा केलाय.

(who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed)

who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed
Shah Rukh Khan: मी बॅंक अकाऊन्ट उघडू शकत नाही, अॅसीड हल्ला पीडीतेची शाहरुखकडे मदतीची हाक

बाईपण भारी देवा सिनेमाचं नाव आधी मंगळागौर होतं. सिनेमाची स्क्रिप्ट जेव्हा कलाकारांना देण्यात आली तेव्हा त्यावर मंगळागौर लिहीलं होतं.

पण नंतर मात्र हे नाव बदलुन बाईपण भारी देवा हे नाव देण्यात आलं. हे नाव कोणी सुचवलं याचा खुलासा खुद्द केदार शिंदेंनीच केलाय.

केदार शिंदेंनी पोस्ट करत लिहीलंय की... बाईपण भारी देवा हे सिनेमाचं नाव नव्हतं. त्याचं working title होतं "मंगळागौर". \

ते बदलण्याचा विचार जेव्हा आला तेव्हा, अजित भुरे यांनी सुचवलं की, गाण्याची catch line जी आहे ती ठेवली तर? बाईपण भारी देवा याचं credit पुर्ण वलय मुळगुंद या गीतकाराचं आहे. ते गाणं त्याने फारच अप्रतिम लिहिलं आहे.

who give baipan bhaari deva movie title director kedar shinde revealed
Lapataganj Arvind Kumar: 'लापतागंज'मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; शुटसाठी जात असतानाच...

केदार शिंदे शेवटी लिहीतात... स्त्री केंद्रस्थानी ठेवून तीच्या भावभावना उत्तम मांडल्या आहेत. आणि ती शेवटची कविता!!! माझी मैत्रीण @ashwinithepoem त्यावेळी मदतीला धावून आली. या सिनेमाचा शेवट वेगळा होता.

पण मंगळागौर गाणं संपल्यावर एवढ्या उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कुठला सीन करणं जड जाणार होतं. ही कवितेची आयडिया डोक्यात आली.

संपुर्ण सिनेमाचा सार व्यक्त करणारी ती कविता अश्विनीने लिहिली. या प्रवासात असंख्य माणसं महत्वाची ठरली. कोटीची उड्डाणं करणारा हा सिनेमा तयार होताना ही मंडळी विसरून चालणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.