Farmer death : काम करताना २३५ शेतकऱ्यांनी गमावला जीव...अद्यापही ८३ जणांना अनुदानाची प्रतीक्षा

Farmer deaths : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३५ शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असून, अजूनही ८३ कुटुंबांना मदतीची प्रतीक्षा आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत काही कुटुंबांना सहाय्य मिळालं आहे.
Farmer death
Farmer deathsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शेती व्यवसाय कष्टाचा आहेच; पण सोबत जोखमीचाही आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या एकाच वर्षात जिल्ह्यात तब्बल २३५ शेतकऱ्यांचा शेतीकामात अपघाती मृत्यू झाला.

यापैकी १५२ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून प्रत्येकी दोन लाख, तर कायमचे अपंगत्व आलेल्या पाच शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख अशी ३ कोटी ९ लाख रुपयांची मदत करण्यात आली. पण, अजूनही ८३ कुटुंबीयांना मदतीची प्रतीक्षा आहे.

एकट्या वैजापूर तालुक्यात सर्वांत जास्त म्हणजेच ५९ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला.शेतात काम करताना सर्पदंश, मळणी यंत्रात हात जाणे, ट्रॅक्टर अपघात अशा विविध कारणांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास राज्य सरकारच्या या सानुग्रह योजनेतून दोन लाख रुपये, तर कायमचे अपंगत्व आल्यास प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात येते.

सहा महिन्यांत ११ प्रस्ताव मंजूर

एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल शंभरावर शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी सप्टेंबर अखेर जवळपास ११ प्रस्ताव मंजूर झाले. यातील खुलताबाद तालुक्यातील चार मृत्यू आहेत.

काय आहेत अटी?

राज्यभरातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले आई-वडील, शेतकऱ्याची पती-पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक (१० ते ७५ वर्षे वयोगटातील) एकूण दोन जणांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येते. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने अपघात, वीज पडून मृत्यू, शेतकऱ्याचा खून होणे, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश, बाळंतपणातील मृत्यू मदतीसाठी पात्र आहेत.

अपंगत्व आल्यास...

अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा, अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान स्वरूपात मदत दिली जाते.

मातृशक्तीला वंदन

नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा जागरच. त्यामुळेच या नऊ दिवसात बातम्यांच्या बायलाइनमध्ये आईचेही नाव देण्याचा प्रयोग `सकाळ`ने केला आहे.

शेतकऱ्यांच्या मृत्यूसंदर्भातील सर्व अहवालासह प्रस्ताव प्राप्त झाल्यास तत्काळ त्यांच्या वारसदारांना मदतीची प्रक्रिया केली जाते. निकषात बसत नसलेले प्रस्ताव नामंजूर करण्यात येतात. शेतकऱ्यांना त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव दाखल करावेत, त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल.

- प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.