School management : आहारातील बदलाला वादाची फोडणी, शाळा व्यवस्थापन समिती अन् मदतनिसांचे सूत्र जुळेना

School management : मध्यान्ह भोजन योजनेत केलेल्या आहार बदलांमुळे शाळांमध्ये मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, आणि मदतनीसांमध्ये वाद उभे राहिले आहेत.
School food management
School food managementsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शालेय मुलांचे पोषण व्हावे, त्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना सुरू केली. या पोषण आहारात यंदा मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. यामध्ये रोज मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) व आठवड्यातून चार वेळा गोड पदार्थ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र, गोड पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण भरमसाठ; तर स्प्राउट्ससाठी वापरण्यात येणाऱ्या कडधान्याला मोड येण्यासाठी प्रक्रिया करायची कोणी, याबाबत मदतनीस महिलांमध्ये वाद सुरू झाले.पोषण आहाराच्या नवीन वेळापत्रकानुसार आठवड्यातून चार वेळा गोड पदार्थ देण्यात येतो.

यामध्ये साखरेचे प्रमाण तब्बल ३० ते ४५ ग्रॅम देण्याच्या सूचना दिल्या. याला बालरोगतज्ज्ञांनी अगोदर विरोध केला; तसेच या पोषण आहारात रोज मोड आलेले कडधान्य द्यावे, असे आदेश आहेत. त्यासाठी मटकी, वाटाणा, मूग असे कडधान्य शाळांना देण्यात आले. मात्र, हे कडधान्य कुठे भिजून ठेवायचे? याबाबत सूचना देण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती, मदतनीस महिलांमध्ये वाद व्हायला सुरवात झाली आहे.

दिवसा ठेवावे लागते भिजवून

एका मुख्याध्यापकाने सांगितले, कडधान्याला मोड येण्यासाठी ते दिवसभर भिजवून ठेवावे लागते. नंतर त्याला कपड्यात बांधून ठेवावे लागते. तेव्हा कुठे मोड येतात. दिवसभर शाळेत कडधान्य भिजवून ठेवू शकतो. मात्र, रात्री त्याला शाळेत कपड्यात भिजून ठेवू शकत नाही; कारण या भिजून ठेवलेल्या कडधान्यावर रात्री शाळेत किडे-मुंग्या, पाली फिरण्याची शक्यता असते. त्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकते.

म्हणून काही स्वयंपाकी महिला हे कडधान्य घरी घेऊन जातात. मात्र, त्यालाही शालेय व्यवस्थापन समितीचा विरोध असतो. दरम्यान, ज्या मदतनीस स्वतःच्या घरी कडधान्य भिजवण्यासाठी घेऊन जातात, दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या घरी त्या कडधान्याची भाजी बनवलेली असते, असा आरोप आहे. ज्या ठिकाणी दोन मदतनीस महिला आहेत, तेथे कडधान्य घरी नेऊन भिजवून ठेवण्यासाठी भांडणे व्हायला लागली आहेत. अशा अनेक तक्रारी मुख्याध्यापकांकडे येत आहेत.

मातृशक्तीला वंदन

नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा जागरच. त्यामुळेच या नऊ दिवसात बातम्यांच्या बायलाइनमध्ये आईचेही नाव देण्याचा प्रयोग `सकाळ`ने केला आहे.

दूध पावडर, गूळ, साखरेला मुंग्या

शासनाने पोषण आहारात आठवड्यातून चार वेळा गोड पदार्थ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळांमध्ये दूध पावडर, गूळ, साखर असे पदार्थ आणून ठेवले जातात. त्यांना अनेकदा दूध पावडर, गोड पदार्थाला मुंग्या लागलेल्या असतात. त्यातूनदेखील विषबाधा होण्याची शक्यता असते, असे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.