खतांचा अतिवापर टाळा,माती परीक्षणाच्या आधारावरच करा उपयोग; कृषी विभागाचे आवाहन

रासायनिक खतांचा अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते.
chemical fertilizers
chemical fertilizersSakal
Updated on

Chemical Fertilizers: रासायनिक खतांचा अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करायचा झाल्यास पिकांना पाणीही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. साहजीकच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर करणे धोक्याचा आहे. यासाठी पिकांना योग्य मात्रा आवश्यकतेप्रमाणे देण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

आज मोठ्या प्रमाणावर होत असलेला रासायनिक खतांचा वापर आणि घटत चाललेली अन्नधान्याची गुणवत्ता, मानवाच्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम, निसर्गावर होणारे वाईट दुष्परिणाम या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले, तर रासायनिक शेती ही किती धोकादायक आहे हे आपल्याला समजून येते. रासायनिक खतांचा वाढता वापर घातक आहे. शेतीत पिकणारा भाजीपालाच आज मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असतो.

परंतु रासायनिक खतांचा वापर केलेल्या या पिकांचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. बाजारात येणाऱ्या पालेभाज्यांवर रासायनिक खतांचा सर्रास वापर होतो. नागरिकही बाजारातून या भाजीपाल्याची खरेदी करतात. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असतो. रासायनिक खतांप्रमाणे कीटकनाशकांच्या वापराचे देखील वाईट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. कीटकांचा नाश करणारी कीटकनाशके अर्थातच विषारी असतात. तथापि, रासायनिक खतांच्या वापरातून जमिनीवर दुष्परिणाम होता. खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची हानी होते. यामुळे खतांचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

chemical fertilizers
10th Board Result : निवासी शाळांनीही राखली गुणवत्ता ; मराठवाड्यातील सात शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के

जमिनीचा पोत बिघडतो

उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा दिल्या जाते. रासायनिक खतांचा अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करायचा झाल्यास पिकांना पाणीही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते.

रासायनिक खतांचा वापर हा माती परीक्षणाच्या आधारावरच करावा. जेणे करून, जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीत कमी प्रमाणात आहे त्याचे जमिनीत संतुलन होवू शकेल. त्याचप्रमाणे जिवाणू खत व सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करावा. शक्यतो रासायनिक खते ही जमिनीवर उघड्यावर न देता जमिनीखाली पेरून द्यावी. तसेच पिकांना अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीद्वारे तसेच फवारणीद्वारे करावे. खतांचा अतिवापर टाळावा. त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

— राहुल चौधरी, विषय विशेषज्ञ (मृदाशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र

जमिनीचा पोत टिकून राहावा यासाठी चणा आणि सोयाबीन या पिकांचे उत्पादन घ्यावे. कापसाचे पीक जमिनीचा पोत कमी करते. आजकाल मोठ्या प्रमाणात शेतात रासायनिक खतांचा वापर करावा लागतो. दरवर्षी मागील वर्षीच्या तुलनेत जास्तीची रासायनिक खते द्यावी लागतात.

— नारायण शिंदे, शेतकरी, लालवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com