फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात खरिपाच्या अंगामात अद्रक पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सड, करपा यासारख्या आदी रोगांनी बाधित झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणवले आहे. महागड्या औषधाचा वापर केल्यानंतरही रोगराई थांबत नाही. कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.