Jalna: पिक विम्याच्या रकमेसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जलसमाधीचा दिला इशारा!

Jalna: जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबंधित विमा कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
Jalna: पिक विम्याच्या रकमेसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जलसमाधीचा दिला इशारा!
Updated on

Kumbhar Pimpalgaon: घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२३ खरीप हंगामातील पीक विम्याची राहिलेली ७५ टक्के रक्कम त्याचप्रमाणे रब्बी हंगाम २०२३ मधील विम्याच्या तक्रारी करूनही न मिळालेली विम्याची रक्कम ताबडतोब देण्यात यावी नसता दोन आॅगस्टला गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा गुंज बुद्रुक (ता.घनसावंगी) येथील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (ता.२५) जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार व संबंधित विमा कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घनसावंगी तालुक्यातील सन२०२३ च्या खरीप विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली आहे मात्र पिक विम्याची उर्वरित राहिलेली ७५ टक्के रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही तसेच २०२३ च्या रब्बी हंगामातील हरभरा, गहू,ज्वारी या पिकाची विम्याच्या तक्रारी दाखल करूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही.

Jalna: पिक विम्याच्या रकमेसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जलसमाधीचा दिला इशारा!
Jalna Rain Update : जालना शहरासह जिल्ह्यात पावसाची रिमझिम, नागरिकांची उडाली तारांबळ

मागील २०२३ मध्ये २७ व २८ नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते तर हरभरा पिकावर मर रोग आल्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. सदर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केलेले असताना अद्याप पर्यंत २०२३ मधील रब्बी पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही,

Jalna: पिक विम्याच्या रकमेसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कंपनीसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जलसमाधीचा दिला इशारा!
Jalna : ओबीसींची उद्यापासून जनआक्रोश यात्रा

वरील विम्याची रक्कम एक अॉगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग न झाल्यास सर्व शेतकरी दोन आॅगस्ट रोजी गुंज बुद्रुक येथील गोदावरीच्या पात्रात जलसमाधी घेणार आहेत तरी प्रशासनाने दखल घ्यावी असा इशारा युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पोलिस निरीक्षक व संबंधित युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिलेल्या निवेदनात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.