Jalna Maratha Andolan: राहुल गांधी यांच भाषण जनतेतून चर्चेतून घालवण्यासाठी जालन्यात लाठीमार, काँग्रेसचा आरोप

जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत
Jalna Maratha Andolan
Jalna Maratha AndolanEsakal
Updated on

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल (शुक्रवारी) लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेमुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केली. परिसरात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली.

यामध्ये काही आंदोलक आणि पोलीस देखील जखमी झाले आहेत. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणंही चांगलंच तापल्याचं दिसून आलं. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

'या सरकारचा प्रत्यय आम्हाला वारंवार पहायला मिळतो आहे. या सरकारची मानसिकता ही खच्चीकरण करणारी आहे. भाजप प्रणित देशातील सरकार असो किंवा राज्यातील सरकार असो हे सरकार लोकशाहीच खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता निवडणुकीच्या तोंडावर सांगायचं आम्ही आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवलं. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये या पध्दतीची एक वाटचाल सुरू झाली',असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Jalna Maratha Andolan
Lathicharge On Maratha Reservation Protesters Jalna: जालन्यातील घटनेनंतर शरद पवार आणि उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय; आंदोलकांना भेटून...

तर पुढे बोलताना पटोले म्हणाले की, '२०१४ ते २०१९ च्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना आधिकार नसतानाही चुकीचा कायदा आणून आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून पुन्हा पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील असा प्रयत्न भाजप सरकारने केला.

तर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. जी काही मर्यादा आहे ४० टक्क्यांची तिला वाढवा देशातील सरकार भाजपच्या ताब्यात आहे. पण तिथे त्यांच्यात बोलण्याची हिम्मत नाही, कारण तिथे त्यांच्या नोकऱ्या जातील', असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

Jalna Maratha Andolan
जालन्यातील प्रकरणावर छगन भुजबळांनी मांडली रोखठोक भुमिका; म्हणाले, 'काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी...'

'त्याचबरोबर काल उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज होणं ही घटना इतिहासातील पहिली घटना आहे. काल इंडियाची बैठक होती. त्यामध्ये राहुल गांधी यांच भाषण जनतेतून चर्चेतून घालवण्यासाठी कालची घटना घडवल्याचाही आरोप पटोलेंनी यावेळी केला आहे. तर राज्याचे गृहमंत्री सांगतात आम्ही सौम्य लाठीचार्ज केला पण तो का केला असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर या घटनेवर नाना पटोले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलीस आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Jalna Maratha Andolan
Jalna Lathi Charge : जालन्यातील हिंसाचार प्रकरणात १६ ज्ञात तर ३०० पेक्षा जास्त अज्ञातांवर गुन्हे दाखल; पोलिसांना जीवे मारण्याचा कटाचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.