Latest Parli Vaijnath News: शहरातील आर्य समाज सभागृहात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.१५) गुप्त बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शहरात कुठेही विचारणा होत नाही.
निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नाहीत अशा अनेक तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या. पदाधिऱ्यांनी हे विचार पंकजा मुंडे यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचा निर्णय घेत पंकजा मुंडे यांनी जर काही विचार नाही केला तर सामूहिक राजीनामे देण्यात येणार असल्याची भुमिका घेण्यात आली.