Farmers Compensation : चाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर अनुदान जमा; 6 हजार लाभार्थींनी अद्याप केले नाही केवायसी

रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हरभरा पिकाला बसला. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
Farmers Compensation
Farmers Compensation Sakal
Updated on

कळमनुरी : अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान केवायसी केलेल्या ४५ हजार शेतकऱ्यांपैकी ४० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील एकूण ५१ हजार शेतकऱ्यांपैकी ४५ हजार शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे. दरम्यान, अद्याप सहा हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केले नाही. त्यांचे अनुदान अजूनही रखडल्या गेले आहे.

रब्बी हंगामात झालेल्या अतिवृष्टीचा फटका हरभरा पिकाला बसला. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

यामधून एकूण क्षेत्रफळापैकी हेक्टरी ३० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये अनुदान मंजूर केले होते.

Farmers Compensation
Gas Connection KYC : अत्यंत महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा बंद होईल गॅस कनेक्शन, या तारखेपर्यंत आहे अंतिम मुदत

तालुक्यातील ५१ हजार शेतकऱ्यांचे हरभरा पिकाचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आता शासनाकडून प्रति हेक्टरी ३० टक्केच्या प्रमाणात ३१ कोटी ७३ लाख ५६ हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान प्राप्त झाले आहे.

अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार ४५ हजार ११५ शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे. यापैकी चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मंजूर झालेले अनुदान जमा झाले आहे.

Farmers Compensation
Farmer E-KYC : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसीचे आवाहन

केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या नावे टप्प्याटप्प्याने मंजूर झालेले अनुदान बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अजूनही जवळपास सहा हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी केवायसी केली नसल्यामुळे शासनाकडून त्यांना मिळणारे अनुदान रखडल्या गेले आहे. या लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून शासनाकडून उपलब्ध झालेले अनुदान प्राप्त करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान प्राप्त झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही. त्यांनी केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, त्याशिवाय अनुदान बँक खात्यावर जमा होणार नाही.

-सुरेखा नांदे, तहसीलदार, कळमनुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.